शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

१.१५ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:07 IST

४४३ कोटी थकीत : कळवा, मुंब्रा आघाडीवर

ठाणे : एकीकडे कळवा, मुंब्य्रात सध्या टोरन्ट वीज कंपनीच्या मुद्यावरुन गोंधळ सुरु आहे. असे असताना या भागातील वीज ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी आहे. या भागातील वीज ग्राहकांनी मागील काही वर्षांत महावितरणचा तब्बल ३८९.४४६ कोटींचा भरणा केला नसल्याचा माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ७७ हजार ५ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित केल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. ठाणे १,२ आणि विभाग तीनमधील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीजही कायमची खंडित करण्यात आली आहे. संपूर्ण ठाणे शहरात १ लाख १५ हजार ५८० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला असून त्यांनी महावितरणची ४४३.११ कोटींची देणी थकवली आहेत.

कळवा, मुंब्य्राच्या वीज खाजगीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. टोरन्ट कंपनीला कळवा, मुंब्य्रात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दिला आहे. दुसरीकडे महावितरण मात्र टोरन्टसाठी आग्रही आहे. येथील वीजेची मागणी, थकबाकी आणि उत्पन्नाचे गणित जुळत नसल्यानेच खाजगीकरणाची कुºहाड या भागावर उगारण्यात आली आहे. आता त्यात काही अंशी तथ्य असल्याचेही महावितरणच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. महावितरणने थकबाकीदारांची आणि कायमचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे डीव्हीजन २ मध्ये येणाऱ्या कळवा, पॉवर हाऊस आणि विकास आदी भागांचा समावेश असून येथील १८ हजार ३६८ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे. येथील वीज ग्राहकांनी महावितरणची २६.३७ कोटींची थकबाकी थकवली होती.

ठाणे डिव्हीजन तीनमध्ये मुंब्रा शीळ भागातील ७७ हजार ५ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तब्बल ३८९.४४६ कोटींची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

वागळे इस्टेट सब डिव्हजन भागातील कोलशेत, लोकमान्य आणि वागळे इस्टेट येथील १२ हजार ८९५ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला असून त्यांच्याकडे १८ कोटी ८०५ कोटींची थकबाकी होती. ठाणे डिव्हीजन १ मध्ये येणाऱ्या गडकरी, किसन नगर आणि कोपरी भागातील २२६७ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून त्यांनी महावितरणची ८ कोटी ८ लाख २२ हजारांची थकबाकी ठेवली होती.