शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्ट्रक्चरल ऑडिटविषयी अनास्था, केडीएमसीच्या नोटिशीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:24 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी ‘क’ प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत सर्वाधिक २०० इमारती धोकादायक आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी ‘क’ प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत सर्वाधिक २०० इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी १५० इमारतींना प्रभाग अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या इमारती रिक्त करण्याचे आदेश रहिवासी पाळत नाहीत. तसेच इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याबाबतही त्यांच्यात अनास्था असल्याचे पाहायला मिळत आहे.महापालिका हद्दीत ४७३ धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती आहेत. त्यापैकी २०० इमारती ‘क’ प्रभागातील आहेत. मात्र, या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव रहिवासी, सोसायट्या अथवा जमीनमालकांकडून महापालिकेस प्राप्त होत नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी १५० धोकादायक इमारतींना नोटिसा बजावून रहिवासी आणि मालकांना इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याबाबत बजावले आहे. मात्र, तरीही रहिवासी त्यास काडीमात्र दाद देत नाहीत. महापालिकेने नेमलेल्या पॅनलकडे स्ट्रक्चरल आॅडिटसाठी भाडेकरू अथवा इमारतमालक , रहिवासी जातच नाहीत. त्यामुळे अशा इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट होत नाही, अशी धक्कादायक माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.अतिधोकादायक इमारतींचे वीज आणि पाणीपुरवठा जोडणी खंडित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रत्येक प्रभाग अधिकाºयांना दिले होते. त्यानुसार, ‘क’ प्रभाग अधिकाºयांनी अतिधोकादायक इमारतींच्या नळजोडण्या तोडल्या आहेत. ज्या इमारतीत रहिवासी नाहीत, तेथील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.मात्र, धोकादायक इमारतींमध्ये नळजोडण्या तोडण्यासाठी पथक गेले असता रहिवाशांकडून त्यांना विरोध होतो. त्यामुळे ही कारवाई फारशी प्रभावी ठरलेली नाही. प्रत्येक वेळी कारवाईस जाताना पोलीस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे धोकादायक इमारती रिक्त करण्याची कारवाई प्रभावी ठरलेली नाही.‘क’ प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या तीन मजली अतिधोकादायक इमारतीस महापालिकेने कारवाईची नोटीस बजावली असता इमारतधारकांनी न्यायालयातून महापालिकेच्या नोटिशीला स्थगिती मिळवली आहे. हा आदेश फार काळ तग धरणारा नसला, तरी दरम्यानच्या काळात इमारत कोसळण्याची दुर्घटना घडल्यास सगळे खापर महापालिकेवर फोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांनी सांगितले.नागरिकांमध्ये जागृतीचा अभावमहापालिकेच्या स्ट्रक्चरल आॅडिट पॅनलवरील वास्तुविशारद नयन ढकोलिया म्हणाले की, महापालिका हद्दीतील नागरिकांमध्ये स्ट्रक्चरल आॅडिटविषयी हवी तशी जागृती दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जीविताचे महत्त्व नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे अनास्थेचे वातावरण आहे.काही इमारती ‘आयआयटी’कडे पाच लाख रुपये भरून स्ट्रक्चरल आॅडिट करत आहेत. पाच लाख रुपये भरल्यावरही त्यांचा या आॅडिटचा रिपोर्ट हा एक महिन्यानंतर मिळतो. महापालिकेच्या पॅनलवरील आम्ही वास्तुविशारद हे आठवडाभरात हा रिपोर्ट तयार करून देतो.तळ अधिक चार मजली इमारत व फ्लॅटची संख्या पाहता किमान ४० हजार रुपये आॅडिटसाठी लागतात. हा खर्च कोणी करायचा, असा प्रश्न या मंडळींसमोर असतो. जीवाच्या किमतीपुढे ४० हजार रुपये नगण्य आहेत.चार मजली इमारतीत १६ फ्लॅटधारक गृहीत धरल्यास प्रत्येकी अडीच हजार रुपये काढले तरी ४० हजार रुपये जमा होऊन आॅडिट रिपोर्ट करता येऊ शकतो. धोकादायक इमारतीत राहणाºया रहिवाशांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली