शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

उल्हासनगर रिपाइंतील वाद चव्हाट्यावर, शहरजिल्हाध्यक्षांना डावलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:19 IST

उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण.

ठळक मुद्देउपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणुकी पूर्वी निवड समितीची स्थापना करण्यासाठी रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी बी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बैठक झाली. मात्र शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.

उल्हासनगरात रिपाइंची ताकद चांगल्या प्रमाणात असून महापालिकेत पक्षाचे ३ नगरसेवक आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष व गटनेते भगवान भालेराव हे उपमहापौर असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम चालत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिकेच्या निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने, पक्षाचे पदाधिकारी बी बी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी बैठक होऊन, निवडणुकीपूर्वी निवड समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका निवडणुकीत पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बी.बी.मोरे म्हणाले. तसेच निवड समितीस पक्षप्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याकडून मान्यता घेण्यात येईल. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

प्रत्यक्षात पक्षाची जबाबदारी शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांच्याकडे दिल्याने, पक्ष प्रमुख आठवले निवड समितीला मान्यता देणार का? असा प्रश्न निर्माण झाला. तसेच पक्षातील वादावर काय निर्णय घेतात. याकडेही पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

शहर रिपाइंची जबाबदारी माझ्याकडे - भगवान भालेरावशहरात रिपाइंची ताकद वाढविण्याची जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी माझ्याकडे दिली. अशी प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली. येत्या दोन दिवसात नव्या दमाची निवड समिती स्थापन करणार असून समितीला पक्षप्रमुख रामदास आठवले यांची मान्यता असणार आहे, असेही भालेराव म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरElectionनिवडणूकRamdas Athawaleरामदास आठवले