शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कचरा विल्हेवाटीचा निर्णय सर्वसहमतीनेच, पालकमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:47 IST

कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली.

ठाणे - कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली. ही समस्या मोठी असून, यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि गृहसंकुलांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल. या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, शासनाने डम्पिंग ग्राउंडला परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने येथून पुढे मोकळ्या जागेवर कचरा न टाकता त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.कचऱ्याची विल्हेवाट गृहसंकुलांनीच लावण्याबाबतचे आदेश ठाणे महापालिकेने दिले होते. विल्हेवाट न लावणाºया गृहसंकुलांचा कचरा १५ जुलैपासून न उचलण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला होता. पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या निर्णयाला सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या आदेशानुसार महापालिकेने गृहसंकुलांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. रविवारी विविध गृहसंकुलांच्या कचरा विल्हेवाटीसंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गृहसंकुलांच्या विनंतीनुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या तळमजल्यावर आयोजित या बैठकीला दीडशेहून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वसंत विहार अ‍ॅपेक्स कमिटी, हिरानंदानी इस्टेट रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, हिरानंदानी मेडोज रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, पीटीआरए, ठाणे हाउसिंग सोसायटीज फोरम, ठाणे सिटीझन फोरम, ब्रह्मांड अशा विविध गृहसंकुलांचे प्रतिनिधी आणि मनपा पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.जबाबदारी महापालिकेचीकचरा उचलणे आणि कचºयाची विल्हेवाट लावणे, ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे मत याप्रसंगी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.गृहसंकुलांकडे पुरेशी जागा नाही, निधी नाही आणि कचºयाची विल्हेवाट लावण्याचे कौशल्यदेखील नाही. प्रकल्प उभारल्यानंतर तो चालवण्याची आणि उद्या त्यात काही बिघाड झाला, तर ती जबाबदारी घेण्याची क्षमता गृहसंकुलांकडे नाही, असे अनेक मुद्दे याप्रसंगी मांडण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे