शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कचरा विल्हेवाटीचा निर्णय सर्वसहमतीनेच, पालकमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:47 IST

कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली.

ठाणे - कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली. ही समस्या मोठी असून, यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि गृहसंकुलांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल. या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, शासनाने डम्पिंग ग्राउंडला परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने येथून पुढे मोकळ्या जागेवर कचरा न टाकता त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.कचऱ्याची विल्हेवाट गृहसंकुलांनीच लावण्याबाबतचे आदेश ठाणे महापालिकेने दिले होते. विल्हेवाट न लावणाºया गृहसंकुलांचा कचरा १५ जुलैपासून न उचलण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला होता. पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या निर्णयाला सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या आदेशानुसार महापालिकेने गृहसंकुलांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. रविवारी विविध गृहसंकुलांच्या कचरा विल्हेवाटीसंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गृहसंकुलांच्या विनंतीनुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या तळमजल्यावर आयोजित या बैठकीला दीडशेहून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वसंत विहार अ‍ॅपेक्स कमिटी, हिरानंदानी इस्टेट रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, हिरानंदानी मेडोज रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, पीटीआरए, ठाणे हाउसिंग सोसायटीज फोरम, ठाणे सिटीझन फोरम, ब्रह्मांड अशा विविध गृहसंकुलांचे प्रतिनिधी आणि मनपा पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.जबाबदारी महापालिकेचीकचरा उचलणे आणि कचºयाची विल्हेवाट लावणे, ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे मत याप्रसंगी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.गृहसंकुलांकडे पुरेशी जागा नाही, निधी नाही आणि कचºयाची विल्हेवाट लावण्याचे कौशल्यदेखील नाही. प्रकल्प उभारल्यानंतर तो चालवण्याची आणि उद्या त्यात काही बिघाड झाला, तर ती जबाबदारी घेण्याची क्षमता गृहसंकुलांकडे नाही, असे अनेक मुद्दे याप्रसंगी मांडण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे