शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

प्रधानमंत्री आवास योजनेला नापसंती

By admin | Updated: June 29, 2017 02:47 IST

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील झोपड्यांच्या विकासासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील झोपड्यांच्या विकासासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी उत्तनच्या धावगी-डोंगर येथील झोपडपट्टीची नुकतीच पाहणी केली. त्यावेळी झोपडीधारकांनी योजनेला नापसंती दर्शवत योजनेतील तरतुदीनुसार कर्ज काढण्यासह निश्चित रक्कम भरण्यास नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तत्कालिन राजीव आवास योजनेतंर्गत मीरा-भार्इंदरमधील झोपड्यांचे अनेक वर्षापासून सर्वेक्षण होऊनही त्या योजनेचे फलित प्राप्त झाले नसले तरी युती सरकारची प्रधानमंत्री आवास योजना मात्र प्रभावशाली असल्याचा दावा केला जात आहे. या योजनेतंर्गत पालिकेने शहरातील ४६ झोपडपट्यांचे सर्र्वेक्षण सुरू केले. शहरातील सुमारे २८३ एकर जागेवर वसलेल्या या झोपडपट्यांतील झोपड्यांची एकूण संख्या २७ हजार ५०७ इतकी असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी १७ हजार २६२ झोपड्यांचेच सर्र्वेक्षण पूर्ण झाले. उर्वरित झोपड्या सर्र्वेक्षणापासून वंचित ठेवल्या आहेत. यातील बहुतांश झोपडपट्या केंद्राच्या मीठ विभागाच्या तर काही राज्य सरकारच्या व पालिकेच्या सुविधा भूखंडांवर वसल्या आहेत. पालिकेने एकूण ४६ झोपडपट्यांपैकी उत्तनच्या धावगी-डोंगर येथील लालबहाद्दूर शास्त्रीनगर, भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व पूर्वेकडील आदर्श इंदिरानगर झोपडपट्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निवड केली आहे. या झोपडपट्याही सरकारी व पालिकेच्या भूखंडावर असून आंबेडकरनगर व इंदिरानगर या झोपडपट्या सीआरझेड बाधित आहेत. त्यामुळे योजना तडीस जाण्यास अडचण असली तरी तरी त्याची पूर्तता सरकार दप्तरी तसेच पालिकेच्या विकास आराखड्यातील बदलानुसार केली जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सर्र्वेक्षण पूर्ण झालेल्या झोपडपट्यांतील एकूण ३ हजार २०० झोपडीधारकांना लाभार्थी म्हणून जाहीर करण्यात आले असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च अंदाजित आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या टप्प्यात सुमारे ५० कोटींची तरतूद पालिकेकडून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या योजनेच्या पूर्णत्वासाठी सल्लाागाराची नियुक्ती केली आहे. या समितीने बैठकीत योजनेची माहिती देण्यात आली. त्यात केंद्र व राज्य सरकारचा आर्थिक वाटा असला तरी झोपडीधारकांनाही पक्की घरे मिळवण्यासाठी सुमारे ३० ते ४० टक्के रक्कम मोजावी लागणार आहे.