शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कुणबी शिवसैनिकांचे आज चिंतन, जिल्हा परिषदेच्या पदांमध्ये डावलल्याने असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:42 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून, त्या पक्षाला भरघोस मतदान करून, तीन तालुक्यात शिवसेनेच्या पदरी घसघशीत जागा टाकूनही वेगवेगळ््या सभापतीपदांच्या निवडणुकीत कुणबी समाजाच्या पदरात अवघे एक पद पडल्याने या समाजात तीव्र असंतोष पसरला असून त्यावर चर्चा करण्यासाठी पडघा येथे गुरूवारी तातडीने चिंतन शिबिर होणार आहे.

- मेघनाथ विशेपडघा  - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून, त्या पक्षाला भरघोस मतदान करून, तीन तालुक्यात शिवसेनेच्या पदरी घसघशीत जागा टाकूनही वेगवेगळ््या सभापतीपदांच्या निवडणुकीत कुणबी समाजाच्या पदरात अवघे एक पद पडल्याने या समाजात तीव्र असंतोष पसरला असून त्यावर चर्चा करण्यासाठी पडघा येथे गुरूवारी तातडीने चिंतन शिबिर होणार आहे. भिवंडी, कल्याण, शहापूर तालुक्यातील कुणबी समाजाचे पदाधिकारी त्याला उपस्थित राहणार असल्याने शिवसेनेतील खदखद बाहेर पडण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेचे सदस्यही या बैठकीत सहभागी होणार असल्याने पक्षात उघडउघड दोन गट तयार झाले आहेत. कुणबी समाजातील शिवसैनिकांनी भिवंडी, शहापूर व कल्याण तालुका संपर्कप्रमुख विष्णू चंदे यांच्या पडघा येथील कार्यालयात ही बैठक बोलावली असून सत्ताधारी सेनेवरच हा समाज नाराज झाल्याने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भावना या नेत्यांत आहे.ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावशाली लोकसंख्या म्हणून कुणबी समाजाकडे पाहिले जाते. कुणबी समाजाचा कौल कसा असेल, यावरच जिल्हा परिषदेची समीकरणे अवलंबून होती. शिवसेनेच्या पारड्यात कुणबी समाजाची मते मोठ्या संख्येने पडली. त्यातच कुणबी सेनेनेही भाजपाला विरोधी म्हणून शिवसेनेला उघड पाठिंबा दिला होता. त्यातूनच जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आली. मात्र समाजाला हवा तसा सत्तेच्या पदांचा वाटा मिळाला नाही. आरक्षण गृहीत धरले तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार विषय समित्या अशा सहा जागांपैकी आगरी समाजाला सर्वाधिकचे तीन, आदिवासी समाजाला दोन, तर कुणबी समाजाला अवघे एक पद मिळाले. त्यातून ही धुसफूस वाढली. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे समाजातील एकमेव सदस्य आहेत, पण हे पद राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहे. भिवंडी तालुक्यात चारपैकी तीन समित्यांतील एका जागेवर तरी कुणबी समाजातील व्यक्तीची निवड होईल, असे वाटत होते. मात्र शिवसेनेने तिन्ही आगरी समाजातील उमेदवार दिले. यामुळे कुणबी गट नाराज असून कल्याणचे तालुकाप्रमुख वसंत लोणे, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, संपर्कप्रमुख विष्णू चंदे, विभागप्रमुख के. बी. विशे यांच्या नेतृत्वाखाली समाजावरील अन्यायाविरोधात दुपारी चार वाजता चिंतन शिबिर होणार आहे.जिल्हा परिषदेत पाठिंबा मिळावा म्हणून शहापूरमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीच्या सत्तेत वाटा दिला. त्याविरोधात तेथे पक्षात राडा झाला होता. नंतर भिवंडीतही स्वीकृत सदस्यावरून पक्षात बंड झाले होते. त्यापाठोपाठ पक्षातील अन्य समाजांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान देत कुणबी समाज आक्रमक पवित्रा घेत उभा ठाकल्याने शिवसेनेतील आव्हान वाढले आहे.मतपेढी गमावण्याची भीतीठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुणबी समाजाची संख्या लक्षणीय आहे. मध्यंतरीच्या काळात का समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. नंतर कुणबी सेना त्या पक्षात विलीन झाली. पण अन्य पक्षांनी समाजाचा वापर करून घेतला, पण पदे दिली नाहीत म्हणून त्या समाजाने यावेळी शिवसेनेला पाठिंबा दिला, पण त्या पक्षानेही मतपेढी म्हणून समाजाचा वापर केल्याची नाराजी या समाजात आहे. मुरबाडमध्ये या समाजाने किसन कथोरे यांना पाठबळ दिले. त्यामुळे तेथे भाजपाच्या यशात वाढ झाली. त्यामुळे शिवसेनेने तातडीने पदे दिली नाहीत, तर ही मतपेढी गमावण्याची भीती आहे, असे या समाजातील नेत्यांना वाटते.आगरी समाजाचे वर्चस्वशिवसेनेत मराठा आणि आगरी समाजाचे प्राबल्य वाढत असल्याने त्याबज्जल कुणबी समाजात नाराजी आहे. पक्षातील पद वाटपात आणि प्रत्यक्ष सत्तेची पदे देण्यातही या समाजाला डावलले गेल्याची भावना आहे. त्यातच कुणबी समाजात आरक्षणाचा वाटा हवा; पण या समाजात रोटी-बेटी व्यवहार करण्याची तयारी नाही, यामुळेही हा समाज दुखावला गेला. त्यानंतरही या समाजाने शिवसेनेला पाठबळ दिले. पण त्या बदल्यात समाजाच्या पदरी काही पडले नसल्याची भावना तीव्र बनल्याने त्याचे पडसाद या बैठकीत उमटण्याची चिन्हे आहेत.मुरबाड, अंबरनाथची बैठकही दोन-तीन दिवसांतमुरबाडमध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. तेथे शिवसेनेला पार यश मिळाले नसले, तरी त्या आणि अंबरनाथ तालुक्यातील कुणबी समाजाच्या शिवसैनिकांची बैठकही पुढील दोन-तीन दिवसांत घेतली जाईल. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचा पद वाटपातील निर्णय पूर्ण चुकला आहे. भिवंडी, शहापूर आणि कल्याणमध्ये कुणबी समाजामुळे चांगले यश मिळूनही तिन्ही तालुक्यातील पदे आगरी समाजाला दिली. त्या समाजाला झुकते माप देण्यात आले. सर्वसमावेशक विचार करून कुणबी समाजाला एक तरी सभापतीपद द्यायला हवे होते, अशी स्पष्ट भूमिका विष्णू चंदे यांनी मांडली. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे