शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

आधारवाडी डम्पिंगवर आज चर्चा

By admin | Updated: July 15, 2016 01:30 IST

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंगचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नेमके काय करता येईल, सध्या महापालिका त्यासाठी कोणती पावले उचलते आहे

कल्याण : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंगचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नेमके काय करता येईल, सध्या महापालिका त्यासाठी कोणती पावले उचलते आहे, त्यात कल्याणकरांचा सहभाग कसा वाढवता येईल, यावर निर्णय घेण्यासाठी आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याबाबत भूमिका ठरवण्यासाठी उद्या, शुक्रवार, १५ जुलैला खास चर्चा होणार आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘आधारवाडी डम्पिंग ग्राउंड समस्या आणि उपाय’ या शीर्षकाखाली हा कार्यक्रम पार पडेल. कल्याण पश्चिमेतील वाडेघर सर्कल येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता ही चर्चा होईल.कल्याण शहर स्मार्ट करायचे असेल तर तेथील कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय शोधले पाहिजेत, अशी भूमिका महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी घेतली आहे. त्याबरोबरच कचरा तयार होतानाच त्यातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जनजागृतीही सुरू आहे. मात्र, त्यातील नागरिकांचा सहभाग वाढेपर्यंत दीर्घकाळ जाईल. दरम्यानच्या काळात क्षमता संपल्याने आधारवाडी डम्पिंग बंद करावे, या मागणीने जोर धरला. पण, पर्याय उभा राहिला नाही. डम्पिंगला लागणाऱ्या आगीमुळे आधारवाडीचा परिसर दुर्गंधी आणि धुराच्या साम्राज्यात सापडत आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम जसा होतो आहे, तसाच परिसराच्या विकासावरही होतो आहे. त्यावर, या वेळी साधकबाधक चर्चा होईल.याबाबत, सतत पाठपुरावा करणारे ज्येष्ठ वकील शांताराम दातार, घनकचरा प्रकल्पाचे अभ्यासक श्रीकृष्ण भागवत, डम्पिंगचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणारे डॉ. नितीन बावस्कर आणि स्थानिक शिवसेना नगरसेवक मोहन उगले या चर्चेत सहभागी होतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.