शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘मागासवर्गीय असल्यानेच भेदभाव’, भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महापौरावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:45 IST

मागासवर्गीय नगरसेविका असल्याने शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर भेदभाव करून पाण्याची समस्या सोडवत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका खंडागळे यांनी केला आहे.

कल्याण : मागासवर्गीय नगरसेविका असल्याने शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर भेदभाव करून पाण्याची समस्या सोडवत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका खंडागळे यांनी केला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे यांच्या प्रभागात गेल्या अडीच वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या आहे. संतप्त महिलांनी सोमवारी दुपारी १२ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली. स्थायी समितीकडून महासभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने सुरक्षारक्षकांनी संतप्त महिलांना आत सोडले नाही. या महिलांच्या शिष्टमंडळास घेऊन खंडागळे यांनी प्रशासनाची भेट घेतली असता १५ दिवसांत पिसवली गोळवलीतील पाणीसमस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासन दाद देत नाही.२०१५ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पिसवली-गोळवली प्रभाग क्रमांक ८६ मधून भाजपातर्फे खंडागळे या निवडून आल्या. पिसवली-गोळवली हा परिसर २७ गावांत होता. ही गावे महापालिकेत आली, तर त्यागावची पाणीपुरवठ्याची व्यवस्था एमआयडीसीकडे आहे. त्याचे बिल महापालिका भरते. महापालिका महिन्याला एक कोटीप्रमाणे वर्षाकाठी १२ कोटींचे बिल भरते. एमआयडीसीकडून पुरेसा पाणीपुरवठाच केला जात नाही. त्यामुळे पिसवली-गोळवली परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. निवडून आल्यापासून सातत्याने पाणीपुरवठ्यासाठी खंडागळे या पाठपुरावा करतात. एकदा मोर्चा काढला होता. त्याचबरोबर महापालिकेत धाव घेतली होती. आता तीव्र उन्हाळा सुरू झाला. त्यात आठवड्यात शुक्रवारी औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बंद असतो. याशिवाय, सात टक्के पाणीकपात लागू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आठवड्यातील पाच दिवस पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. हा पाणीपुरवठा दोन दिवसही होत नाही.पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी रविवार, २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता नगरसेविका खंडागळे यांच्या घरावर धाव घेतली. या वेळी संतप्त नागरिकांनी खंडागळे यांच्या घराचे प्रवेशद्वारच तोडून आत प्रवेश केला. नागरिकांनी त्यांचा रोष व्यक्त केला. या सगळ्यांना शांत करून नागरिकांनी पाण्यासाठी महापालिका मुख्यालयात यावे, असे आवाहन खंडागळे यांनी रविवारी रात्री केले.अडीच वर्षे पाठपुरावा करून ही समस्या सुटत नसल्याने खंडागळे यांनी महापौर देवळेकर यांच्यावर निशाणा साधला. मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक पाण्याचा प्रश्न लटकवून ठेवल्याचे खंडागळे यांचे म्हणणे आहे. भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि गटनेते वरुण पाटील यांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नाही.