शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

नुकसानग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:50 IST

महामार्ग दुरुस्तीचे काम; कंत्राटदाराने शेतात रसायन ओतले, विहिरीतील पाणीही काळे पडले

कसारा : मुंबई-नाशिक महामार्ग दुरु स्तीचे काम सुरू असतानाच कंत्राटदार कंपनी असलेल्या पीक इन्फ्रा या कंपनीच्या पोटकंत्राटदाराने रस्तादुरु स्तीसाठी आणलेले डांबरसदृश रसायन चिंतामणवाडी येथील शेतकऱ्याच्या जमिनीत व विहिरीत ओतून दिल्याने शेतकरी असलेल्या खंडू वाताडे यांच्या जमिनीतील काही पिके जळून गेली. तेथील विहिरीतही रसायन गेल्याने संपूर्ण विहिरीतील पाणी काळे पडले.याप्रकरणी खंडू वाताडे यांनी तहसील कार्यालय व कसारा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणी कसारा पोलिसांनी संबंधित कंत्राटदार कंपनीकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. दरम्यान, कंपनीचा एकही अधिकारी पोलीस ठाण्यात आला नव्हता. त्यांच्याऐवजी पोटकंत्राटदाराला पाठविले होते.चाळीसहून अधिक पोते भातपीक देणारी सुपीक जमीन घातक रसायनामुळे नापीक झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वाताडे हे नियमित भातपीक घेतात. परंतु, रसायनामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पोटकंत्राटदाराची दबंगगिरीदरम्यान, शुक्रवारी कसारा पोलिसांनी पोटकंत्राटदारास (नाव कळू शकले नाही) घटनास्थळी चौकशीसाठी बोलावले असता वाताडे हे रसायनांची गाडी, कर्मचारी याबाबत माहिती देत असताना पोटकंत्राटदाराने पोलीस ठाण्यात आवाज वाढवत दबंगगिरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी रस्त्यावरील डांबर रसायन व शेतात ओतलेले रसायन यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून पुढील कारवाई करणार असल्याचे कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रेय भोये यांनी सांगितले.शेतकºयावर उपासमारीची वेळया रसायनामुळे माझ्या शेतजमिनीचे नुकसान होऊन माझ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. माझ्या तक्रारअर्जावरून दोषींवर कारवाई करून मला न्याय देण्याची मागणीखंडू वाताडे यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी