शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

महिला कायद्याचा गैरफायदा स्त्रियांकरिता त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 12:48 AM

न्यायाधीश व्ही.एच.चव्हाण  

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कायदे केले असून ते प्रभावी आहेत. महिलांवरील अत्याचारासंदर्भातील कायद्यांचा काही लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. कायदे महिलांच्या बाजूने असले, तरी त्याचा गैरफायदा घेण्याची वृत्ती वाढल्यास ते भविष्यात महिलांसाठी त्रासदायक ठरू शकले, असे प्रतिपादन उल्हासनगर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही.एच. चव्हाण यांनी केले.माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा वापर आणि त्याचा गैरवापर कसा होतो, याची माहिती दिली. गैरवापर झाल्यास त्याचा थेट परिणाम त्या महिलेवरच होतो. त्यामुळे कायद्यांचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले, तसेच कौटुंबिक वाद हे घरच्या घरी किंवा मध्यस्थीने मिटविणे हे शहाणपण असल्याचे मत व्यक्त केले, तोच धागा पकडून न्या.चव्हाण यांनी वरील प्रतिपादन केले. अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांची संख्या वाढत असली, तरी समाजाच्या एका विशिष्ट गटात आजही अनेक महिला मुकाटपणे अन्याय सहन करीत आहेत. त्यांची ही भूमिका महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ करणारी ठरत आहे, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले. अंबरनाथ नगरपरिषद व उल्हासनगर न्यायालय तालुका विधी समितीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने पालिका सभागृहात महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी केलेल्या कायद्यांचा गैरफायदा घेण्याची वृत्ती वाढल्यास ते महिलांकरिता त्रास ठरू शकेल, हे आपले वैयक्तिक मत आहे.न्यायाधीश के.एम.मराठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती दिली, तर न्यायाधीश बी. बावकर यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती देत त्या कायद्यांचा कोणत्या परिस्थितीत वापर करता येईल, याची कल्पना उपस्थित महिलांना दिली. न्यायाधीश एन.ए. माने यांनीही सावित्रीबाईच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला न्यायाधीश एन.आर. गजभिये, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ.धीरज चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, पी.एल.व्ही. सदस्या चंदा गान, गुलाब जाधव, स्नेहल उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते.

संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे- निंबाळकरपालिकेच्या विधी विभागाच्या सल्लागार ॲड. साधना निंबाळकर म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला, तो त्या काळातील समाजाच्या विरोधात होता. आजही परिस्थिती तशीच असून, केवळ संघर्ष हा समाजाबरोबर नसून घरातील माणसांसोबत आहेत. त्यामुळे हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.