शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

महापौरपदासाठी काँग्रेस तसेच कोणार्क आघाडीत थेट लढत; आज निवडणूक, घोडेबाजार जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 02:45 IST

भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक पार पडणार आहे.

- नितीन पंडितभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेत कोणार्क विकास आघाडीकडून काँग्रेसला सुरुंग लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, त्यामुळे काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि कोणार्कमध्ये थेट लढत असून, त्यामुळे घोडेबाजारही जोरात सुरू आहे.भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका पप्पू राका, वैशाली मनोज म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील, तर शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी पक्षाच्या नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वैशाली म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिवसेनेकडे फक्त १२ नगरसेवक असल्याने वंदना काटेकर यांचा महापौरपदावरचा दावा धूसर झाला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका राका व कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्यातच थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे काही नगरसेवक कोणार्क विकास आघाडीच्या तंबूत दाखल झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणार्क विकास आघाडीकडून काँग्रेसच्या एका गटाला उपमहापौरपद देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून, या पदासाठी इम्रान वली मो. खान हे दावेदार मानले जात आहेत. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणार्कच्या गोटात गेलेल्या काँग्रेस नगरसेवकांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले तर, महापौरपदी काँग्रेसच्या रिषिका राका आणि उपमहापौरपदी मुख्तारमोहंमद अली खान यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पालिका निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये युती झाली होती. युतीधर्म पाळत भाजपने यावेळी कोणार्क विकास आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. महापालिकेत काँग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत ९० नगरसेवक असून, त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्क विकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.महापौर निवडणूक असल्याने पालिकेच्या प्रवेशद्वारावर खासगी बसमधून येणाºया नगरसेवकांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. नगरसेविकांच्या बदल्यात त्यांचे पतीराज पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करून निवडणुकीत तोरा मिरवत असल्याचेही यानिमित्ताने दिसत आहे.घोडेबाजारामुळे वाढली चुरसमहापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने भिवंडीत नगरसेवकांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याला लगाम घालण्यासाठी शासनाने सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेदेखील आपला ३० नगरसेवकांचा गट नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेतले होते.काँग्रेसने उपमहापौरपदाची माळ सेनेच्या गळ्यात घातली होती. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या काँग्रेसची बाजू मजबूत आहे. मात्र, घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. ते समीकरणही भिवंडी महानगरपालिकेच्या या निवडणुकीत जुळवून आणण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी