शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

मुंबईकरांसाठी खूशखबर! बारवी, आंध्रा, मोडकसागर भरले, भातसा, तानसा भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:52 IST

भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.

ठाणे : चार दिवसांपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या लाभक्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पाणीकपातीची चिंता काहीअंशी कमी झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणासह आंध्रा, मोडकसागर १०० टक्के भरले होते. याशिवाय भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.गेल्या वर्षी सर्व धरणे आॅगस्ट महिना संपण्याआधी भरली होती. यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, दरम्यानच्या काळात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरण क्षेत्रात २४ तासांत सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी, खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगाव ८३ आणि ठाकूरवाडीच्या लाभक्षेत्रात ५० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. आता या धरणाची पाणीपातळी ६८.९६ मीटर झाली आहे.या धरणात आणखी ३.६४ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. तूर्तास या धरणात ७१.२२ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याचवेळी तो १००.११ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा करण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडेतीन मीटर पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर, या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवीप्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. रविवारी या धरणक्षेत्रात ३८ मिमी पाऊसपडला.आंध्र धरणात यंदा प्रथमच रविवारी ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात २१ मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मध्य वैतरणात रविवारी ५० मिमी पाऊस पडून, धरणात ८२ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे.>जिल्ह्यात रविवारी सरासरी २३ मिमी पाऊस पडला. यापैकी कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२ मिमी पाऊस पडला आहे.