शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

मुंबईकरांसाठी खूशखबर! बारवी, आंध्रा, मोडकसागर भरले, भातसा, तानसा भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:52 IST

भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.

ठाणे : चार दिवसांपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या लाभक्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पाणीकपातीची चिंता काहीअंशी कमी झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणासह आंध्रा, मोडकसागर १०० टक्के भरले होते. याशिवाय भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.गेल्या वर्षी सर्व धरणे आॅगस्ट महिना संपण्याआधी भरली होती. यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, दरम्यानच्या काळात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरण क्षेत्रात २४ तासांत सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी, खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगाव ८३ आणि ठाकूरवाडीच्या लाभक्षेत्रात ५० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. आता या धरणाची पाणीपातळी ६८.९६ मीटर झाली आहे.या धरणात आणखी ३.६४ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. तूर्तास या धरणात ७१.२२ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याचवेळी तो १००.११ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा करण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडेतीन मीटर पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर, या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवीप्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. रविवारी या धरणक्षेत्रात ३८ मिमी पाऊसपडला.आंध्र धरणात यंदा प्रथमच रविवारी ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात २१ मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मध्य वैतरणात रविवारी ५० मिमी पाऊस पडून, धरणात ८२ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे.>जिल्ह्यात रविवारी सरासरी २३ मिमी पाऊस पडला. यापैकी कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२ मिमी पाऊस पडला आहे.