शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

लोकसहभागाशिवाय समस्या सुटणे कठीण

By admin | Updated: June 29, 2017 02:44 IST

केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांमध्ये त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी येथील ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात केले. कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या वेळी महापौरांनी पत्रकार आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शहरातील विविध समस्या आणि भविष्यातील योजना याबाबत आपले विचार मांडले. सध्या शहरात भेडसावणारा डम्पिंगचा प्रश्न असो अथवा फेरीवाला अतिक्रमणाचा विषय, याबाबत बोलताना महापौरांनी या समस्या निकाली काढण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि उपलब्ध असलेले मनुष्यबळ यात आमचे प्रयत्न अपुरे पडत असतील. मात्र, आमचा प्रयत्न सुरूच राहील. परंतु, नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे काळाची गरज असल्याचे देवळेकर म्हणाले.आम्ही फेरीवाल्यांविरोधात कारवाई करतो. परंतु, ज्या वेळी नागरिक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणे थांबवतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने या समस्येला आळा बसू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तम आरोग्यसेवा, चांगली उद्याने, करमणूक आणि मनोरंजनाच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्मार्ट सिटी’द्वारे सकारात्मक बदल झालेले पाहावयास मिळतील, असा दावाही त्यांनी केला. २७ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही नागरी सुविधा तेथील विकास प्रकल्पांची सांगड घालून तेथील नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. कल्याणची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी दुर्गाडी किल्ल्याचे जतन करण्याबरोबरच लवकरच आरमार स्मारक उभारले जाईल. तसेच आरमार दिन साजरा करण्याची घोषणाही महापौरांनी केली.