शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

लोकसहभागाशिवाय समस्या सुटणे कठीण

By admin | Updated: June 29, 2017 02:44 IST

केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांमध्ये त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी येथील ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात केले. कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या वेळी महापौरांनी पत्रकार आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शहरातील विविध समस्या आणि भविष्यातील योजना याबाबत आपले विचार मांडले. सध्या शहरात भेडसावणारा डम्पिंगचा प्रश्न असो अथवा फेरीवाला अतिक्रमणाचा विषय, याबाबत बोलताना महापौरांनी या समस्या निकाली काढण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि उपलब्ध असलेले मनुष्यबळ यात आमचे प्रयत्न अपुरे पडत असतील. मात्र, आमचा प्रयत्न सुरूच राहील. परंतु, नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे काळाची गरज असल्याचे देवळेकर म्हणाले.आम्ही फेरीवाल्यांविरोधात कारवाई करतो. परंतु, ज्या वेळी नागरिक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणे थांबवतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने या समस्येला आळा बसू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तम आरोग्यसेवा, चांगली उद्याने, करमणूक आणि मनोरंजनाच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्मार्ट सिटी’द्वारे सकारात्मक बदल झालेले पाहावयास मिळतील, असा दावाही त्यांनी केला. २७ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही नागरी सुविधा तेथील विकास प्रकल्पांची सांगड घालून तेथील नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. कल्याणची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी दुर्गाडी किल्ल्याचे जतन करण्याबरोबरच लवकरच आरमार स्मारक उभारले जाईल. तसेच आरमार दिन साजरा करण्याची घोषणाही महापौरांनी केली.