शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

लोकसहभागाशिवाय समस्या सुटणे कठीण

By admin | Updated: June 29, 2017 02:44 IST

केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांमध्ये त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी येथील ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात केले. कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या वेळी महापौरांनी पत्रकार आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शहरातील विविध समस्या आणि भविष्यातील योजना याबाबत आपले विचार मांडले. सध्या शहरात भेडसावणारा डम्पिंगचा प्रश्न असो अथवा फेरीवाला अतिक्रमणाचा विषय, याबाबत बोलताना महापौरांनी या समस्या निकाली काढण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि उपलब्ध असलेले मनुष्यबळ यात आमचे प्रयत्न अपुरे पडत असतील. मात्र, आमचा प्रयत्न सुरूच राहील. परंतु, नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे काळाची गरज असल्याचे देवळेकर म्हणाले.आम्ही फेरीवाल्यांविरोधात कारवाई करतो. परंतु, ज्या वेळी नागरिक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणे थांबवतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने या समस्येला आळा बसू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तम आरोग्यसेवा, चांगली उद्याने, करमणूक आणि मनोरंजनाच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्मार्ट सिटी’द्वारे सकारात्मक बदल झालेले पाहावयास मिळतील, असा दावाही त्यांनी केला. २७ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही नागरी सुविधा तेथील विकास प्रकल्पांची सांगड घालून तेथील नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. कल्याणची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी दुर्गाडी किल्ल्याचे जतन करण्याबरोबरच लवकरच आरमार स्मारक उभारले जाईल. तसेच आरमार दिन साजरा करण्याची घोषणाही महापौरांनी केली.