शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुर्वीच्या काळी आणि आजही गुरू होणं कठिण : डॉ. शारदा निवाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 11:44 IST

अत्रे कट्ट्यावर गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरू’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

ठळक मुद्देपुर्वीच्या काळी आणि आजही गुरू होणं कठिण : डॉ. शारदा निवाते अत्रे कट्ट्यावर गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरू’ या विषयावर व्याख्यानप्राचीन काळात श्रेष्ठ दर्जाचे गुरूकुल होते : डॉ. शारदा निवाते

ठाणे: खरा गुरू व अंधश्रद्धा पसरविणारे गुरू यांतील फरक मी नेहमी विद्यार्थ्यांना समजावून सांगत असते. पुर्वीच्या काळी आणि आजही गुरू होणं कठिण आहे. गुरूने दिलेल्या ज्ञानाचे नुसतं प्रवचन देऊन त्यातून गुरूंना समाधान मिळणार नाही तर जेव्हा त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन केले जाईल त्यावेळी गुरूंना समाधान मिळेल असे प्रतिपादन डॉ. शारदा निवाते यांनी केले. अत्रे कट्ट्यावर गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरू’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

यावेळी डॉ. निवाते यांनी आपल्या व्याख्यानातून गुरूंची महती सांगितली. त्या म्हणाल्या की, अज्ञानाचा अंधकार दूर करुन ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा, सुचक, वाचक, प्रेरणादायी, दर्शक, बोधक, शिक्षक हे गुरू आहेत. आपल्याकडे गुरूशिष्य परंपरा आहे. प्राचीन काळात श्रेष्ठ दर्जाचे गुरूकुल होते आणि तेथून श्रेष्ठ दर्जाचे ज्ञानही मिळत होते. गुरू म्हणजे ज्ञान. जे खरे मार्गदर्शन करतात तेच गुरू आणि त्यांच्यासमोरच नतमस्तक व्हावे हे मुलांना सांगण्याची गरज आहे. मनापासून केलेला , साश्रुनयनांनी केलेला नमस्कार म्हणजे त्या माणसांतील गुण आपल्यात संक्रमीत करतो. आपण जन्माला येतो तेव्हा आपला पहिला गुरू ही आपली आई असते, परमेवराला वेळ नव्हता म्हणून त्याने आईची निमिर्ती केली अश्ी कवी कल्पना आहे असे सांगत त्यांनी ‘आई हे देवाचे रुप...’ ही कविता सादर केली. अतिसज्जन बनण्याचा प्रयत्न केल्यास तो नक्कीच अंगाशी येतो. वास्तव हे आपण स्वीकारलेच पाहिजे हे आम्ही मुलांना सांगत असतो. शिष्य देखील गुरूंची परिक्षा घेत असतात हे सांगणारी एक कथा त्यांनी उपस्थितांना ऐकविली. प्रात्यक्षिकांचे ज्ञान जे शिकवतील त्यांनाच आपण गुरू बोलूया आणि त्यांनाच वंदन करु या असे आवाहनही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून केले. कट्टयाच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांची सुरुवातीला ओळख करुन दिली. शेवटी कट्ट्याच्या संस्थापिका संपदा वागळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.------------------------------फोटो : अत्रे कट्टा 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई