शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डोंबिवलीकरांनी महापालिकेचे घोडे मारले का?; माजी सभापतींचा केडीएमटीला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 00:14 IST

पनवेल, वाशी, ठाणे सेवा का नाही

डोंबिवली : शनिवारपासून केडीएमटी उपक्रमाने उसाटणेमार्गे पनवेल बस सुरू केली असून लवकरच वाशी आणि बेलापूर मार्गावर बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा विद्यमान सभापती मनोज चौधरी यांनी केली आहे. कल्याणमधून बस सोडता, तर मग डोंबिवलीमधून का नाही, असा सवाल डोंबिवली मनसे शहराध्यक्ष तथा परिवहनचे माजी सभापती राजेश कदम यांनी केला आहे. डोंबिवलीकरांनी महापालिकेचे घोडे मारले आहे का? बस न सोडल्यास मनसे स्टाइलने समाचार घेऊ, असा इशारा कदम यांनी उपक्रमाला दिला आहे.

मिशन बिगिनअंतर्गत शनिवारपासून लांब पल्ल्यांच्या मार्गावर बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सभापती चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण-पनवेल मार्गावर बस वाहतूक सुरू झाली. यावेळी परिवहनचे सदस्य अनिल पिंगळे आणि उपक्रमाचे अधिकारी उपस्थित होते. लवकरच कल्याण-वाशी, कोकण भवन, कल्याण-ठाणे मार्गावर बस चालवल्या जातील, अशी घोषणा चौधरी यांनी केली. यावेळी चालक आणि वाहकांना तसेच प्रवाशांना सोशल डिस्टन्सचे नियम आणि खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. कल्याणप्रमाणे डोंबिवलीहूनही लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी कदम यांनी केली आहे. डोंबिवलीकर कर भरत नाही का? मग डोंबिवलीहून पनवेल, वाशी, ठाणे बससेवा का सुरू करत नाही? असे सवाल कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. दोन शहरांमध्ये महापालिका दुजाभाव का करते? डोंबिवली पनवेल, वाशी, ठाणे बससेवा सुरू झालीच पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :MNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका