शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचं तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: June 28, 2024 17:32 IST

प्रकल्प बाधित व्यक्तींना शासकिय नोकरी मिळावी,पुनर्वसन गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले.

भिवंडी: १९५८ मध्ये सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले.यापैकी भिवंडी तालुक्यात कोयना प्रकल्प पुनर्वसनग्रस्तांचे आठ गावे वसविण्यात आली तर त्यानंतर कोयना व्याघ्र प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना २०१२ मध्ये पाच गावे ही सुद्धा भिवंडी तालुक्यात नव्याने वसविण्यात आलेले आहेत. या गावातील पुनर्वसन ग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या विरोधात भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्या आले.

अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे,उपाध्यक्ष अमोल कदम,सल्लगार बळीराम शिंदे,तालुका अध्यक्ष आनंद निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेली या आंदोलनात तालुक्यातील रोहीणे,निवळी,लामज,रामवाडी,करंजवडे,रवदी,चिरंबे,महाळूंगे,माडोशी,कुसापुर मोरणी,पाचगाव या गावातील असंख्य नागरीक सहभागी झाले होते.

कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनिच्या मोबदल्यात खातेदारांना पर्यायी जमीनींचे वाटप करावे, ज्या खातेदारांना अंशतः जमिनी वाटप झाल्या आहेत त्यांना उर्वरित जमिन वाटप करतांना कागदपत्रांच्या जाचक अटी रद्द करावी,प्रकल्पासाठी जमिनी संपादित करते वेळी खातेदारांव्यतिरिक्त असलेल्या पोट खातेदारांना जमीनीचे वाटप केले नसल्याने त्यांनाही पर्यायी जमीन वाटप करावे,प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या व्यतिरिक्त खातेदारांच्या जमिनी मुळ ठिकाणी शिल्लक असलेल्या जमिनींचे वन खातीवर्ग झालेले सातबारे पुनः उघडुन त्या जमिनींचे खातेधारकानां वाटप करावे,प्रकल्प बाधित व्यक्तींना शासकिय नोकरी मिळावी,पुनर्वसन गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सतारा,सांगली,सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे.परंतु ता प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याने या पुढे आंदोलन अधिक तीव्र करून प्रकल्प पुनर्वसन झालेले सर्व जिल्ह्यातील नागरीक २ जुलै रोजी कोकण भवन ते विधान भवन येथ पर्यंत लाँग मार्च ने धडकणार असल्याचा इशारा संघाचे उपाध्यक्ष अमोल कदम यांनी दिला आहे.