शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

धारण करतो तो धर्म, विभक्त करणारा धर्म नाही - धनश्री लेले यांचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 12:49 IST

ठाण्यात सुरु असलेल्या सुयश कला-क्रीडा मंडळ आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प धनश्री लेले यांनी गुंफले. 

ठळक मुद्देदुर्दैवाने धर्म या शब्दाचा खरा अर्थ कळणारी माणसे राजकारणाकडे वळत नाहीत - धनश्री लेलेव्याख्यानमालेचे दुसरे पुष्प धनश्री लेले यांनी गुंफलेज्ञानेश्वरांचे साहित्य आजच्या काळातही महत्वाचे व तितकेच उपयुक्त - धनश्री लेले

ठाणे : हल्ली 'धर्म' हा शब्द उच्चारणे भीतीदायक झाले आहे. धर्म याचा खरा अर्थ धर मग म्हणजेच समाजाला धर, एकत्र कर असा आहे. जो धरतो, धारण करतो तो धर्म. विभक्त करतो तो धर्म नाही. मात्र दुर्दैवाने धर्म या शब्दाचा खरा अर्थ कळणारी माणसे राजकारणाकडे वळत नाहीत. ज्यांना धर्म या शब्दाचा अर्थ माहिती नाही अशी माणसे राजकरणात असल्याने देश विघाताकडे वळत असल्याचे मत निरुपणकार धनश्री लेले यांनी पसायदानातील 'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' या पंक्तीचा अर्थ सांगताना व्यक्त केले.   

सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित  पंधराव्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प निवेदिका धनश्री लेले यांच्या पसायदान काल व आज यावरील व्याख्यानाने श्री सिद्धिविनायक मंदिराचे पटांगण येथे गुंफण्यात आले. पसायदानात विश्वाने स्वधर्माचा सूर्य पाहावा, म्हणजेच प्रकाश पाहावा असे म्हंटले आहे. मात्र स्वधर्म म्हणजेच स्वकर्म. प्रत्येकाने आपले काम शंभर टक्के पूर्ण करावे म्हणजे स्वधर्म. स्वकर्म न करणाऱ्यांना स्वधर्मविषयी बोलणायचा अधिकार नाही असे पुढे त्या म्हणाल्या. पसायदान हे एक प्रकारचे मागणे आहे. मात्र हे मागणे त्याच्याकडेच मागावे जो देऊ शकतॊ. देणारा तो देव, त्याच्याकडे हे मागणे असल्याचे लेले म्हणाल्या. पसायदानातील प्रत्येक ओळीचा व त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लेले यांनी उलगडून दाखविला. ज्ञानेश्वर माउलींनी प्रत्येक शब्द किती जाणीवपूर्वक वापरला असल्याचे यातून प्रतीत होत होते. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भू मंडळी भेट तू भुता या ओळीचा भावार्थ सांगताना ईश्वरनिष्ठ, चांगली, बुद्धीमानी मंडळी एकमेकांना भेटली पाहिजेत असे यात सांगितले आहे. परंतु असे होत नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर अतिशिक्षित व उच्च विद्याविभूषित मंडळी समाजापासून तुटतात अशी खंत महात्मा गांधी यांनी व्यक्त केल्याचे लेले यांनी यावेळी सांगितले. यावरूनच  ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेल्या गोष्टी आजही सांगितल्या जात असून त्यांचे साहित्य आजच्या काळातही महत्वाचे व तितकेच उपयुक्त असल्याचे शेवटी धनश्री लेले यांनी नमूद केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई