शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तीन खाडीकिनाऱ्यांचा बेल्जिअमद्वारे विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 00:32 IST

गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे.

ठाणे : गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात बुधवारी बैठक घेऊन खाडीकिनाऱ्याचा तीन टप्प्यांत विकास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी सकाळी बेल्जिअमस्थितने पोलिसन या संस्थेचे क्रिस पोलिसन, गुल कृपलानी आणि महापालिका अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कामाला गती मिळावी, यासाठी अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष कक्षाची निर्मिती केली असून त्यामार्फत १० नोव्हेंबरअखेर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी स्वारस्य देकार अभिव्यक्ती प्रक्रि या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पालिकेने सुरुवातीला हा संपूर्ण प्रकल्प बीओटीवर राबविण्याचे निश्चित केले होते. आता तीन टप्प्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून पहिला टप्पा हा महसूली उत्पन्नाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यात खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रकल्प महापालिका आणि वित्तीय संस्थेकडून आर्थिक साहाय्य घेऊन राबविण्याबाबत त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.