शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

तीन खाडीकिनाऱ्यांचा बेल्जिअमद्वारे विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 00:32 IST

गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे.

ठाणे : गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात बुधवारी बैठक घेऊन खाडीकिनाऱ्याचा तीन टप्प्यांत विकास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी सकाळी बेल्जिअमस्थितने पोलिसन या संस्थेचे क्रिस पोलिसन, गुल कृपलानी आणि महापालिका अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कामाला गती मिळावी, यासाठी अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष कक्षाची निर्मिती केली असून त्यामार्फत १० नोव्हेंबरअखेर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी स्वारस्य देकार अभिव्यक्ती प्रक्रि या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पालिकेने सुरुवातीला हा संपूर्ण प्रकल्प बीओटीवर राबविण्याचे निश्चित केले होते. आता तीन टप्प्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून पहिला टप्पा हा महसूली उत्पन्नाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यात खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रकल्प महापालिका आणि वित्तीय संस्थेकडून आर्थिक साहाय्य घेऊन राबविण्याबाबत त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.