शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा रद्द : सत्ताधारी भाजपाला धक्का  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:16 IST

उल्हासनगर पालिकेत भाजपाला सत्ता द्या, आठ दिवसांत विकास आराखड्याला मंजुरी देतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, महापौरांना वारंवार आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे लागले.

उल्हासनगर - उल्हासनगर पालिकेत भाजपाला सत्ता द्या, आठ दिवसांत विकास आराखड्याला मंजुरी देतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, महापौरांना वारंवार आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे लागले. अखेर, आराखडा मंजूर झाला. पण, हा आराखडा बिल्डरधार्जिणा आहे. गरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी करत आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे बुधवारच्या महासभेत हा आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर झाल्याने भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे.विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी भाजपासोबत असलेली ओमी टीम तसेच भाजपाच्या काही नगरसेवकांचा आराखड्याला विरोध होता. त्यामुळे हा आराखडा मंजूर करण्याचे मोठे आव्हान भाजपापुढे होते. या आराखड्याबाबत तीन वेळा विशेष महासभा घ्यावी लागली. आज झालेल्या चर्चेनंतर तो रद्द करण्याचा निर्णय झाला. आता हा ठराव रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठवणार असल्याचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्री आता कुठला निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१९७४ मधील विकास आराखड्यात फेरबदल करून नवीन विकास आराखड्याला मंजुरी द्या, असे प्रस्तावात म्हटले आहे. एकूण नवीन विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय महासभेत सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला. महापालिका निवडणुकीपूर्वी शहर विकास आराखड्यास त्वरित मंजुरी द्या, या मागणीसाठी स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवले होते. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आराखड्याला जोरदार विरोध केला होता.झोपडपट्टीतून रिंग रोड तसेच खुले भूखंड, बंद कंपन्यांच्या जागा रहिवासी तर झोपडपट्टी परिसरावर हरितक्षेत्र दाखवल्याने नागरिकांमध्ये एकच असंतोष निर्माण झाला. मनसे, शिवसेना, रिपाइंसह समाजसेवी संघटनेने महापालिकेवर मोर्चे काढून सत्ताधारी भाजपाची कोंडी केली.विकास आराखडा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करून सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र, अशा ठरावाची अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे हा ठराव रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठवण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया आयुक्त निंबाळकर यांनी दिली.जमावबंदीमुळे मोर्चा करावा लागला रद्दशहर विकास आराखडा रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, जिल्ह्यात जमावबंदी लागू झाल्याने मोर्चा रद्द करावा लागला.तरीही, शेकडो महिला, नागरिक आराखड्याविरोधात घोषणा देत महापालिकेवर धडकले होते. त्यांना राजकीय नेत्यांनी नवीन विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव महासभेत मंजूर करून तो सरकारकडे पाठवणार असल्याचे आश्वासन दिले होते.

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणे