शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा रद्द : सत्ताधारी भाजपाला धक्का  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:16 IST

उल्हासनगर पालिकेत भाजपाला सत्ता द्या, आठ दिवसांत विकास आराखड्याला मंजुरी देतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, महापौरांना वारंवार आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे लागले.

उल्हासनगर - उल्हासनगर पालिकेत भाजपाला सत्ता द्या, आठ दिवसांत विकास आराखड्याला मंजुरी देतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, महापौरांना वारंवार आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे लागले. अखेर, आराखडा मंजूर झाला. पण, हा आराखडा बिल्डरधार्जिणा आहे. गरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी करत आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे बुधवारच्या महासभेत हा आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर झाल्याने भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे.विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी भाजपासोबत असलेली ओमी टीम तसेच भाजपाच्या काही नगरसेवकांचा आराखड्याला विरोध होता. त्यामुळे हा आराखडा मंजूर करण्याचे मोठे आव्हान भाजपापुढे होते. या आराखड्याबाबत तीन वेळा विशेष महासभा घ्यावी लागली. आज झालेल्या चर्चेनंतर तो रद्द करण्याचा निर्णय झाला. आता हा ठराव रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठवणार असल्याचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्री आता कुठला निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१९७४ मधील विकास आराखड्यात फेरबदल करून नवीन विकास आराखड्याला मंजुरी द्या, असे प्रस्तावात म्हटले आहे. एकूण नवीन विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय महासभेत सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला. महापालिका निवडणुकीपूर्वी शहर विकास आराखड्यास त्वरित मंजुरी द्या, या मागणीसाठी स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवले होते. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आराखड्याला जोरदार विरोध केला होता.झोपडपट्टीतून रिंग रोड तसेच खुले भूखंड, बंद कंपन्यांच्या जागा रहिवासी तर झोपडपट्टी परिसरावर हरितक्षेत्र दाखवल्याने नागरिकांमध्ये एकच असंतोष निर्माण झाला. मनसे, शिवसेना, रिपाइंसह समाजसेवी संघटनेने महापालिकेवर मोर्चे काढून सत्ताधारी भाजपाची कोंडी केली.विकास आराखडा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करून सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र, अशा ठरावाची अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे हा ठराव रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठवण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया आयुक्त निंबाळकर यांनी दिली.जमावबंदीमुळे मोर्चा करावा लागला रद्दशहर विकास आराखडा रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, जिल्ह्यात जमावबंदी लागू झाल्याने मोर्चा रद्द करावा लागला.तरीही, शेकडो महिला, नागरिक आराखड्याविरोधात घोषणा देत महापालिकेवर धडकले होते. त्यांना राजकीय नेत्यांनी नवीन विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव महासभेत मंजूर करून तो सरकारकडे पाठवणार असल्याचे आश्वासन दिले होते.

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणे