शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

रुंदे गावात साकारतेय देवराई, ५० एकर जागा, २५ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:35 IST

कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

जान्हवी मोर्येडोंबिवली : कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.‘देवराई’च्या प्रकल्प अधिकारी संगीता जोशी म्हणाल्या की, ‘रुंदे गावात पर्यावरण दक्षता मंच आणि वन विभागाने जूनमध्ये वृक्षरोपणास सुरुवात केली. या प्रकल्पाला एनव्हायरो संस्था निधी देणार आहे. तर प्रकल्पासाठी ५० एकर जागा वन विभागाने दिली आहे.त्यापैकी १० एकर जागेवर पावसाळ््यात सात हजार झाडे लावली आहेत. त्यात आवळा, आंबा, आपटा, हिरडा, कांचन, खैर, वड, पिंपळ, काटेसावर अशी १०० जातीची झाडे आहेत. या प्रकल्पातून वनीकरण वाढविण्याचा उद्देश आहे. रुंदेनजीकची काळू नदी आटते. तसेच या परिसरात जमिनीची धूप थांबवणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. वन्यजीव साखळी वनीकरण वाढल्यावर वाढीस लागेल.’पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले म्हणाल्या की, ‘देवराई प्रकल्पासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, रोटरी क्लब यांचे सहकार्य घेतले आहे.जमिनीची पोत तसेच येथे कोणती झाडे रुजतील, याची माहिती वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांकडून घेतली. रोपांकरता विकसित केलेल्या नर्सरीत जवळपास १२ हजार रोपे लावली. त्यापैकी सात हजार रोपांची लागवड केली आहे. सात वर्षांत ५० एकर जागेवर २५ हजार झाडे वाढवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे येथे देवराई बहरणार आहे.’वन्यजीवही वाढणारपर्यावरण दक्षता मंचाने प्रथमच वनीकरणाच्या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. जानेवारीपासून पावसाळ््यापूर्वी जमिनीतील तण काढणे, खड्डे खोदणे याचे काम केले. पाऊस चांगल्याप्रकारे सुरू झाल्यावर झाडे लावली. खत व पाणी देण्याचे काम कर्मचारी व स्वयंसेवक करणार आहेत.प्रकल्प राबवण्यापूर्वी केलेल्या पाहणीत रुंदे येथे मंचाला मोराचे वास्तव्य, सापाची कात, कासवाची अंडी आढळली. भारतातील अनेक वन्यजीव व वनस्पतीच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीव वाढीस लागून जंगल वाढावे, हाच देवराई प्रकल्पामागील हेतू आहे, असे शाईवाले म्हणाल्या.