शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

रुंदे गावात साकारतेय देवराई, ५० एकर जागा, २५ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:35 IST

कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

जान्हवी मोर्येडोंबिवली : कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.‘देवराई’च्या प्रकल्प अधिकारी संगीता जोशी म्हणाल्या की, ‘रुंदे गावात पर्यावरण दक्षता मंच आणि वन विभागाने जूनमध्ये वृक्षरोपणास सुरुवात केली. या प्रकल्पाला एनव्हायरो संस्था निधी देणार आहे. तर प्रकल्पासाठी ५० एकर जागा वन विभागाने दिली आहे.त्यापैकी १० एकर जागेवर पावसाळ््यात सात हजार झाडे लावली आहेत. त्यात आवळा, आंबा, आपटा, हिरडा, कांचन, खैर, वड, पिंपळ, काटेसावर अशी १०० जातीची झाडे आहेत. या प्रकल्पातून वनीकरण वाढविण्याचा उद्देश आहे. रुंदेनजीकची काळू नदी आटते. तसेच या परिसरात जमिनीची धूप थांबवणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. वन्यजीव साखळी वनीकरण वाढल्यावर वाढीस लागेल.’पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले म्हणाल्या की, ‘देवराई प्रकल्पासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, रोटरी क्लब यांचे सहकार्य घेतले आहे.जमिनीची पोत तसेच येथे कोणती झाडे रुजतील, याची माहिती वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांकडून घेतली. रोपांकरता विकसित केलेल्या नर्सरीत जवळपास १२ हजार रोपे लावली. त्यापैकी सात हजार रोपांची लागवड केली आहे. सात वर्षांत ५० एकर जागेवर २५ हजार झाडे वाढवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे येथे देवराई बहरणार आहे.’वन्यजीवही वाढणारपर्यावरण दक्षता मंचाने प्रथमच वनीकरणाच्या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. जानेवारीपासून पावसाळ््यापूर्वी जमिनीतील तण काढणे, खड्डे खोदणे याचे काम केले. पाऊस चांगल्याप्रकारे सुरू झाल्यावर झाडे लावली. खत व पाणी देण्याचे काम कर्मचारी व स्वयंसेवक करणार आहेत.प्रकल्प राबवण्यापूर्वी केलेल्या पाहणीत रुंदे येथे मंचाला मोराचे वास्तव्य, सापाची कात, कासवाची अंडी आढळली. भारतातील अनेक वन्यजीव व वनस्पतीच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीव वाढीस लागून जंगल वाढावे, हाच देवराई प्रकल्पामागील हेतू आहे, असे शाईवाले म्हणाल्या.