शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रुंदे गावात साकारतेय देवराई, ५० एकर जागा, २५ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:35 IST

कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

जान्हवी मोर्येडोंबिवली : कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.‘देवराई’च्या प्रकल्प अधिकारी संगीता जोशी म्हणाल्या की, ‘रुंदे गावात पर्यावरण दक्षता मंच आणि वन विभागाने जूनमध्ये वृक्षरोपणास सुरुवात केली. या प्रकल्पाला एनव्हायरो संस्था निधी देणार आहे. तर प्रकल्पासाठी ५० एकर जागा वन विभागाने दिली आहे.त्यापैकी १० एकर जागेवर पावसाळ््यात सात हजार झाडे लावली आहेत. त्यात आवळा, आंबा, आपटा, हिरडा, कांचन, खैर, वड, पिंपळ, काटेसावर अशी १०० जातीची झाडे आहेत. या प्रकल्पातून वनीकरण वाढविण्याचा उद्देश आहे. रुंदेनजीकची काळू नदी आटते. तसेच या परिसरात जमिनीची धूप थांबवणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. वन्यजीव साखळी वनीकरण वाढल्यावर वाढीस लागेल.’पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले म्हणाल्या की, ‘देवराई प्रकल्पासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, रोटरी क्लब यांचे सहकार्य घेतले आहे.जमिनीची पोत तसेच येथे कोणती झाडे रुजतील, याची माहिती वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांकडून घेतली. रोपांकरता विकसित केलेल्या नर्सरीत जवळपास १२ हजार रोपे लावली. त्यापैकी सात हजार रोपांची लागवड केली आहे. सात वर्षांत ५० एकर जागेवर २५ हजार झाडे वाढवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे येथे देवराई बहरणार आहे.’वन्यजीवही वाढणारपर्यावरण दक्षता मंचाने प्रथमच वनीकरणाच्या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. जानेवारीपासून पावसाळ््यापूर्वी जमिनीतील तण काढणे, खड्डे खोदणे याचे काम केले. पाऊस चांगल्याप्रकारे सुरू झाल्यावर झाडे लावली. खत व पाणी देण्याचे काम कर्मचारी व स्वयंसेवक करणार आहेत.प्रकल्प राबवण्यापूर्वी केलेल्या पाहणीत रुंदे येथे मंचाला मोराचे वास्तव्य, सापाची कात, कासवाची अंडी आढळली. भारतातील अनेक वन्यजीव व वनस्पतीच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीव वाढीस लागून जंगल वाढावे, हाच देवराई प्रकल्पामागील हेतू आहे, असे शाईवाले म्हणाल्या.