शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

ऋण काढून निवडणूक जिंकण्याचा निर्धार; ठामपा तिजोरीत केवळ २५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:13 IST

विकासकामांसाठी प्रसंगी घ्या कर्ज 

ठाणे : पुढचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने जर ठाणे महापालिकेकडे विकास कामांकरिता निधी उपलब्ध नसेल तर कर्ज काढून कामे पूर्ण करा, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी केली. ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना आणखी कर्ज काढून विकास कामे करण्याच्या मागणीबाबत नोकरशाहीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.     

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपले मुद्दे उपस्थित केले. मात्र उत्पन्न वाढीच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला कर्ज काढण्याचा सल्ला दिला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली असतानाही विकास कामे होणे आवश्यक असल्याचे फाटक म्हणाल्या. बरेच उद्योग समूह कर्ज घेतात मग ठाणे महापालिकेला कर्ज घेण्यास काहीच हरकत नाही. पुढचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने आम्हाला लोकांसमोर जायचे आहे. त्यामुळे कर्ज काढून विकास कामे पूर्ण करावी अशी मागणी फाटक यांनी केली. शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी देखील कर्ज काढून विकास कामे करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने नगरसेवकांनी सुचवलेली कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत रेपाळे यांनी व्यक्त केले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यांनी महत्त्वाची कामे केली आहेत त्यांची बिले निघत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. कर्ज घेतले म्हणजे महापालिका डबघाईला आली असे होत नाही. त्यामुळे विकासकामांसाठी कर्ज घेण्याचा आग्रह रेपाळे यांनी धरला.          

 ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे २५ कोटी शिल्लक आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आणि ठेकेदारांची बिले देण्यासाठी ठाणे महापालिकेला शासनाच्या १०० कोटी मुद्रांक शुल्कावर अवलंबून रहावे  लागणार आहे. मात्र परिस्थिती इतकी गंभीर असताना आगामी वर्षात येणाऱ्या निवडणुकांकडे दुर्लक्ष करुन भागणार नाही. महापालिकेकडे पैसे नसल्यास कर्ज काढून नगरसेवकांनी सुचवलेली कामे पूर्ण करा, असा सूर सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनी लावला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक