शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२००५ च्या पुरानंतरही बदलापुरात उल्हास नदीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:07 IST

पालिकेने घेतला नाही बोध : नदीपात्राजवळ सुरू आहेत विकासकामे, भविष्यात होऊ शकतो मोठा धोका

पंकज पाटील बदलापूर : २६ जुलै २००५ रोजीचा महापूर आणि त्यामुळे असह्य यातना भोगलेल्या बदलापूरकरांच्या नजरेतून येथील परिस्थितीवर दृष्टिक्षेप टाकल्यास या शहराने महापुरातून कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसते. महापुरात ज्या उल्हास नदीने रौद्ररूप दाखविले होते, त्या नदीची कोंडी करण्यात बदलापूर आजही कमी पडलेले नाही. पूर नियंत्रणरेषेला न जुमानता नदीपात्राजवळ विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात २००५ च्या पुराची पुनरावृत्ती होऊन बदलापुरात हाहाकार माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी ही महत्त्वाची जीवनवाहिनी झाली आहे. या नदीचे पावित्र्य जपण्यात आणि तिचे संवर्धन करण्यात पालिका प्रशासन कमी पडलेले आहे. उल्हास नदीवर उभारण्यात आलेला बॅरेज डॅम २६ जुलै २००५ च्या महापुरात फुटल्याने बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. बदलापूर स्टेशन परिसरातच १० ते १५ फूट पाणी साचले होते. नदी आणि परिसरातील संपूर्ण भाग हा पाण्याखाली आला होता. रमेशवाडी भागात तर इमारतींच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसानदेखील झाले. संपूर्ण बदलापूर गाव तब्बल पाच दिवस पाण्याखाली होते. बदलापूरकरांनी घरदार सोडून कसाबसा आपला जीव वाचविला. आजही त्या कटू आठवणी बदलापूरकरांच्या मनात घर करून आहेत. महापुरात बदलापूर किती पाण्यात होते, याची कल्पना सर्वांनाच आहे. २००५ मध्ये नुकतीच बदलापूरच्या विकासाची कामे सुरू झाली होती. त्या काळात शहरात नव्याने गृह प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले होते. पुराच्या काळात बदलापुरात मोजक्याच इमारती होत्या. मात्र, आज संपूर्ण बदलापूर शहर इमारतींनी भरले आहे. २००५च्या लोकसंख्येच्या तुलनेत आज बदलापूरची लोकसंख्या अडीच पट वाढली आहे. असे असले तरी बदलापूर पालिका वा शासनाने भविष्यातील हानीचा कोणताच विचार केलेला दिसत नाही. उल्हास नदीपात्रातील पूर नियंत्रणरेषेलाच धाब्यावर बसवण्याचे काम केले आहे. अनेक गृह प्रकल्प हे नदीपात्राजवळच उभारले आहेत. बॅरेज धरणाच्या पात्राला लागूनच बंगलो स्कीम राबवण्यात आली आहे. ज्या परिसरात १५ फुटांपेक्षा जास्त पाणी होते, त्या ठिकाणी बंगले तयार करून त्यांची विक्री केलेली आहे. हाच प्रकार आता नव्याने सुरू झाला आहे. उल्हास नदीवरील बदलापूर गावाकडील पुलापासून वालिवली गावापर्यंतच्या नदीपात्रात अनेक गृह प्रकल्पांची कामे सुरू आहेत. शासनाने नदीपात्रातील गृह प्रकल्पांबाबतचे काही नियम शिथिल केल्याने काही इमारती या थेट नदीपात्रात आल्यात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महापुराच्यावेळी नव्याने विकसित होणाºया वालिवली भागातील मुख्य उतरणीपर्यंत पाणी साचले होते. मात्र, ज्या भागात पाणी साचले होते, त्याच भागात आता खाजगी शाळा आणि गृह प्रकल्प उभारण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, पाणी वाहून नेणारे नालेदेखील अरुंद करून ठेवले आहेत.

नफेखोरीसाठी तळमजल्यावर घरनिर्मिती२००५ च्या महापुरामध्ये ज्या भागात १५ फूट पाणी साचले होते, त्या ठिकाणी इमारतींना परवानगी देताना चक्क तळमजल्यावरही घरांची निर्मिती केली आहे. नदीपात्राच्या परिसरात इमारतींची उभारणी करताना, त्या ठिकाणी इमारतीमधील पहिला मजला हा उंचावर असणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता नफेखोरीसाठी तळमजल्यावर घरनिर्मिती केली आहे.

हेंद्रेपाडा, मांजर्ली, वालिवली, बदलापूर गाव परिसरास पुराचा धोका असतानाही, विकास नियमावली धाब्यावर बसविण्यात आली आहे. पूर नियंत्रणरेषा नेमकी आहे कोठे, हेदेखील निश्चित करण्यात आलेले नाही. काही व्यावसायिकांनी नदीपात्राला लागूनच घरांची निर्मिती केली आहे.