शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलशाहीविरोधात लढण्याची इच्छा फलद्रूप - बी.जी. कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:28 IST

मुस्लिम, दलित, आदिवासी यांनी एकत्र यावे. सगळ्या जातीधर्मांतील गरिबांनी एकत्र यावे आणि ब्राह्मणवाद तसेच भांडवलशाहीविरोधात लढावे,

कल्याण : मुस्लिम, दलित, आदिवासी यांनी एकत्र यावे. सगळ्या जातीधर्मांतील गरिबांनी एकत्र यावे आणि ब्राह्मणवाद तसेच भांडवलशाहीविरोधात लढावे, अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती इच्छा आता नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे फलद्रूप व्हायला लागली आहे. सीएए, एनआरसी, एनपीआर हा केवळ मुस्लिमांचा विषय नसून, हा संपूर्ण देशातील सर्व जातीधर्मांतल्या गरिबांसाठी आणि सर्वांसाठीच चिंतेचा विषय असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी गुरुवारी कल्याणमध्ये पत्रकारांसोबत बोलताना मांडले.संविधान बचाव समिती, कल्याणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कृष्णा टॉकीज मैदानावर जेएनयू, जामिया मिल्लिया आणि इतर विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआर, एनआरसीच्या निषेधार्थ सभा झाली.संपूर्ण देशाला स्वत:च्याविरोधात उभे करुन मोदी आणि शहा यांनी देशावर उपकार केल्याची उपरोधिक टिका कोळसे पाटील यांनी यावेळी केली. ज्या देशातील विद्यार्थ्यांवर सरकार हल्ला करते, ते सरकार लायक नाही. ज्याने मोदींना विरोध केला, त्याला नेस्तनाबूत करण्यात आले आहे. मात्र, मोदी-शहांना घाबरू नका. कारण, जनशक्ती कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.>एनपीआरची यादी तयार करून त्याचाच एनआरसी केला जाईल, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केला. एवढेच नाहीतर, जेएनयू प्रकरणात अजून अटकेची कारवाई झालेली नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेच्या मागे कोण आहे, हे समोर आल्याने पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला.