शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पाऊस सुरू होण्यापूर्वीच तलावांमधील गाळ काढा; जिल्हाधिकारी शिनगारेंचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: June 4, 2023 18:57 IST

गाळमुक्त धरण योजनेच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी  शनिवारी दिवसभर पाहणी केली. पाणी साठा वाढविण्यासाठी तलाव/पाझरतलाव आणि गावतलावातील शंभर टक्के गाळ काढण्याची कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आदी मशिनरी वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले.

गावांमधील तलावांमधील जलस्त्रोतांचे बळकटीकरण व्हावे, पाणी साठा वाढण्यासाठी जिल्ह्यात दहा गावांमधील तलावांमधील गाळ काढण्याची कामे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. यासाठी भारतीय जैन संघटना, वसुंधरा मंडळाचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यातील भिवंडी तालुक्यातील कोन गाव, केल्हे, शहापूर तालुक्यातील कसारा, मुरबाड तालुक्यातील पऱ्हे व शिरवली या गावांतील कामांची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच तेथील सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून कामांची माहिती घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उप विभागीय अधिकारी अमित सानप, उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते.भिवंडीतील कोन गावातील गाव तलावाच्या कामांपासून पाहणी दौऱ्याची सुरूवात झाली. कृषि विभागाच्या सहकार्याने तलावाच्या शेजारी कन्व्हर्जन करून शेतीसाठी या तलावाच्या पाण्याचा वापर करा. तलावाच्या बांधावर बांबूची झाडे लावावीत, तसेच केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. केल्हे गाव तलावातून पहिल्यांदाच गाळ काढण्यात येत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. या गाव तलावाची सीमारेषा आखावी. मुरबाड तालुक्यातील पऱ्हे येथे आमदार किसन कथोरे, सरपंच सोमनाथ भोईर यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारीही दौऱ्याच्या वेळी उपस्थित होते. पऱ्हे गावतलावातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या. शिरवली धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार किसन कथोरे आिण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.

ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा-

जलस्त्रोतांचे बळकटीकरणासाठी तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठा वाढेल. तलावातील गाळामुळे शेतात सुपिकता येईल. त्यामुळे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावी असून प्रशासनाने तलावांमधील गाळ काढण्याच्या कामाला आणखी गती द्यावी. ग्रामस्थांनी योजनेत सहभाग नोंदवून तलावातील गाळ आपल्या शेतात न्यावा. तसेच तलावातील गाळ पाऊस सुरू होण्यापूर्वी काढण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहनही शिनगारे केले.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी