शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस सुरू होण्यापूर्वीच तलावांमधील गाळ काढा; जिल्हाधिकारी शिनगारेंचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: June 4, 2023 18:57 IST

गाळमुक्त धरण योजनेच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी  शनिवारी दिवसभर पाहणी केली. पाणी साठा वाढविण्यासाठी तलाव/पाझरतलाव आणि गावतलावातील शंभर टक्के गाळ काढण्याची कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आदी मशिनरी वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले.

गावांमधील तलावांमधील जलस्त्रोतांचे बळकटीकरण व्हावे, पाणी साठा वाढण्यासाठी जिल्ह्यात दहा गावांमधील तलावांमधील गाळ काढण्याची कामे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. यासाठी भारतीय जैन संघटना, वसुंधरा मंडळाचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यातील भिवंडी तालुक्यातील कोन गाव, केल्हे, शहापूर तालुक्यातील कसारा, मुरबाड तालुक्यातील पऱ्हे व शिरवली या गावांतील कामांची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच तेथील सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून कामांची माहिती घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उप विभागीय अधिकारी अमित सानप, उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते.भिवंडीतील कोन गावातील गाव तलावाच्या कामांपासून पाहणी दौऱ्याची सुरूवात झाली. कृषि विभागाच्या सहकार्याने तलावाच्या शेजारी कन्व्हर्जन करून शेतीसाठी या तलावाच्या पाण्याचा वापर करा. तलावाच्या बांधावर बांबूची झाडे लावावीत, तसेच केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. केल्हे गाव तलावातून पहिल्यांदाच गाळ काढण्यात येत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. या गाव तलावाची सीमारेषा आखावी. मुरबाड तालुक्यातील पऱ्हे येथे आमदार किसन कथोरे, सरपंच सोमनाथ भोईर यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारीही दौऱ्याच्या वेळी उपस्थित होते. पऱ्हे गावतलावातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या. शिरवली धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार किसन कथोरे आिण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.

ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा-

जलस्त्रोतांचे बळकटीकरणासाठी तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठा वाढेल. तलावातील गाळामुळे शेतात सुपिकता येईल. त्यामुळे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावी असून प्रशासनाने तलावांमधील गाळ काढण्याच्या कामाला आणखी गती द्यावी. ग्रामस्थांनी योजनेत सहभाग नोंदवून तलावातील गाळ आपल्या शेतात न्यावा. तसेच तलावातील गाळ पाऊस सुरू होण्यापूर्वी काढण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहनही शिनगारे केले.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी