शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

देसाई यांच्या दिल्लीवारीने ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:54 IST

उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा : दिल्लीतील नेत्यांनाही ठेवले दूर

ठाणे : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सोबत घेऊन शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेथे गेल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्रीपदी स्वत: निवडून येणाऱ्या व इतरांना निवडून आणणाºया नेत्याची नियुक्ती केली जाणार की, केवळ ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर निवड केली जाणार, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाली, तरी शिवसेनेला सत्तेचा समाधानकारक वाटा मिळाला नाही. लोकसभेच्या काही एक्झिट पोलनुसार शिवसेनेच्या जागा १८ वरून १७ इतक्याच कमी होणार आहेत. भाजपला किमान सहा जागांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या दाव्यानुसार, शिवसेनेमुळे लोकसभेला रालोआला फटका बसण्याची चिन्हे आहेत. अर्थात, निकाल काहीही लागले, तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अटळ असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बडे नेते शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे. शिवसेनेने अगोदर जेव्हा विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विरोधी पक्षनेतेपद ठाणे जिल्ह्याकडे चालून आले होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तेव्हा नेतेपद सुभाष देसाई यांच्याकडे सोपवले गेले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या रालोआच्या बैठकीला देसाई यांना पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. कारण, उद्धव हे त्याच दिवशी विदेशातून मुंबईत दाखल झाले होते. खरेतर, दिल्लीतील बैठकीला केंद्रात मंत्रीपदी राहिलेले अनंत गीते, खा. संजय राऊत किंवा आनंदराव अडसूळ यांना धाडणे गरजेचे होते. मात्र, देसाई दिल्लीत जाणार, या कल्पनेने शिवसेनेतील नेते व ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ झाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खुद्द उद्धव यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजप नेतृत्वाचा दूरध्वनी आल्याने सुखावलेल्या उद्धव यांनी पक्षांतर्गत रोष वाढू नये, याकरिता स्वत: हजर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, देसाई यांना सोबत घेऊन गेले. त्यामुळे देसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याच्या शक्यतेमुळे या पदाकरिता इच्छुक नेते व समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

आता जेमतेम तीन महिन्यांकरिता हे पद ज्याला दिले जाईल, त्याचाच निवडणुकीनंतर त्या पदावर दावा राहील. यदाकदाचित, भाजपची पीछेहाट होऊन शिवसेनेची सरशी झाली, तर मुख्यमंत्रीपदावर सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद अत्यल्प कालावधीसाठी मिळालेल्या व्यक्तीचा दावा अधिक प्रबळ राहतो, असे शिवसैनिक खासगीत बोलत आहेत.