शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

देसाई यांच्या दिल्लीवारीने ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:54 IST

उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा : दिल्लीतील नेत्यांनाही ठेवले दूर

ठाणे : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सोबत घेऊन शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेथे गेल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्रीपदी स्वत: निवडून येणाऱ्या व इतरांना निवडून आणणाºया नेत्याची नियुक्ती केली जाणार की, केवळ ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर निवड केली जाणार, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाली, तरी शिवसेनेला सत्तेचा समाधानकारक वाटा मिळाला नाही. लोकसभेच्या काही एक्झिट पोलनुसार शिवसेनेच्या जागा १८ वरून १७ इतक्याच कमी होणार आहेत. भाजपला किमान सहा जागांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या दाव्यानुसार, शिवसेनेमुळे लोकसभेला रालोआला फटका बसण्याची चिन्हे आहेत. अर्थात, निकाल काहीही लागले, तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अटळ असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बडे नेते शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे. शिवसेनेने अगोदर जेव्हा विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विरोधी पक्षनेतेपद ठाणे जिल्ह्याकडे चालून आले होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तेव्हा नेतेपद सुभाष देसाई यांच्याकडे सोपवले गेले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या रालोआच्या बैठकीला देसाई यांना पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. कारण, उद्धव हे त्याच दिवशी विदेशातून मुंबईत दाखल झाले होते. खरेतर, दिल्लीतील बैठकीला केंद्रात मंत्रीपदी राहिलेले अनंत गीते, खा. संजय राऊत किंवा आनंदराव अडसूळ यांना धाडणे गरजेचे होते. मात्र, देसाई दिल्लीत जाणार, या कल्पनेने शिवसेनेतील नेते व ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ झाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खुद्द उद्धव यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजप नेतृत्वाचा दूरध्वनी आल्याने सुखावलेल्या उद्धव यांनी पक्षांतर्गत रोष वाढू नये, याकरिता स्वत: हजर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, देसाई यांना सोबत घेऊन गेले. त्यामुळे देसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याच्या शक्यतेमुळे या पदाकरिता इच्छुक नेते व समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

आता जेमतेम तीन महिन्यांकरिता हे पद ज्याला दिले जाईल, त्याचाच निवडणुकीनंतर त्या पदावर दावा राहील. यदाकदाचित, भाजपची पीछेहाट होऊन शिवसेनेची सरशी झाली, तर मुख्यमंत्रीपदावर सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद अत्यल्प कालावधीसाठी मिळालेल्या व्यक्तीचा दावा अधिक प्रबळ राहतो, असे शिवसैनिक खासगीत बोलत आहेत.