शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

देसाई यांच्या दिल्लीवारीने ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:54 IST

उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा : दिल्लीतील नेत्यांनाही ठेवले दूर

ठाणे : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सोबत घेऊन शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेथे गेल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्रीपदी स्वत: निवडून येणाऱ्या व इतरांना निवडून आणणाºया नेत्याची नियुक्ती केली जाणार की, केवळ ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर निवड केली जाणार, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाली, तरी शिवसेनेला सत्तेचा समाधानकारक वाटा मिळाला नाही. लोकसभेच्या काही एक्झिट पोलनुसार शिवसेनेच्या जागा १८ वरून १७ इतक्याच कमी होणार आहेत. भाजपला किमान सहा जागांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या दाव्यानुसार, शिवसेनेमुळे लोकसभेला रालोआला फटका बसण्याची चिन्हे आहेत. अर्थात, निकाल काहीही लागले, तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अटळ असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बडे नेते शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे. शिवसेनेने अगोदर जेव्हा विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विरोधी पक्षनेतेपद ठाणे जिल्ह्याकडे चालून आले होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तेव्हा नेतेपद सुभाष देसाई यांच्याकडे सोपवले गेले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या रालोआच्या बैठकीला देसाई यांना पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. कारण, उद्धव हे त्याच दिवशी विदेशातून मुंबईत दाखल झाले होते. खरेतर, दिल्लीतील बैठकीला केंद्रात मंत्रीपदी राहिलेले अनंत गीते, खा. संजय राऊत किंवा आनंदराव अडसूळ यांना धाडणे गरजेचे होते. मात्र, देसाई दिल्लीत जाणार, या कल्पनेने शिवसेनेतील नेते व ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ झाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खुद्द उद्धव यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजप नेतृत्वाचा दूरध्वनी आल्याने सुखावलेल्या उद्धव यांनी पक्षांतर्गत रोष वाढू नये, याकरिता स्वत: हजर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, देसाई यांना सोबत घेऊन गेले. त्यामुळे देसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याच्या शक्यतेमुळे या पदाकरिता इच्छुक नेते व समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

आता जेमतेम तीन महिन्यांकरिता हे पद ज्याला दिले जाईल, त्याचाच निवडणुकीनंतर त्या पदावर दावा राहील. यदाकदाचित, भाजपची पीछेहाट होऊन शिवसेनेची सरशी झाली, तर मुख्यमंत्रीपदावर सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद अत्यल्प कालावधीसाठी मिळालेल्या व्यक्तीचा दावा अधिक प्रबळ राहतो, असे शिवसैनिक खासगीत बोलत आहेत.