शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देसाई यांच्या दिल्लीवारीने ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:54 IST

उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा : दिल्लीतील नेत्यांनाही ठेवले दूर

ठाणे : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रालोआच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सोबत घेऊन शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेथे गेल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्रीपदी स्वत: निवडून येणाऱ्या व इतरांना निवडून आणणाºया नेत्याची नियुक्ती केली जाणार की, केवळ ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर निवड केली जाणार, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाली, तरी शिवसेनेला सत्तेचा समाधानकारक वाटा मिळाला नाही. लोकसभेच्या काही एक्झिट पोलनुसार शिवसेनेच्या जागा १८ वरून १७ इतक्याच कमी होणार आहेत. भाजपला किमान सहा जागांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या दाव्यानुसार, शिवसेनेमुळे लोकसभेला रालोआला फटका बसण्याची चिन्हे आहेत. अर्थात, निकाल काहीही लागले, तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अटळ असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बडे नेते शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे. शिवसेनेने अगोदर जेव्हा विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला, तेव्हा विरोधी पक्षनेतेपद ठाणे जिल्ह्याकडे चालून आले होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तेव्हा नेतेपद सुभाष देसाई यांच्याकडे सोपवले गेले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या रालोआच्या बैठकीला देसाई यांना पाठवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. कारण, उद्धव हे त्याच दिवशी विदेशातून मुंबईत दाखल झाले होते. खरेतर, दिल्लीतील बैठकीला केंद्रात मंत्रीपदी राहिलेले अनंत गीते, खा. संजय राऊत किंवा आनंदराव अडसूळ यांना धाडणे गरजेचे होते. मात्र, देसाई दिल्लीत जाणार, या कल्पनेने शिवसेनेतील नेते व ठाण्यातील शिवसैनिक अस्वस्थ झाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खुद्द उद्धव यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. भाजप नेतृत्वाचा दूरध्वनी आल्याने सुखावलेल्या उद्धव यांनी पक्षांतर्गत रोष वाढू नये, याकरिता स्वत: हजर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, देसाई यांना सोबत घेऊन गेले. त्यामुळे देसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याच्या शक्यतेमुळे या पदाकरिता इच्छुक नेते व समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

आता जेमतेम तीन महिन्यांकरिता हे पद ज्याला दिले जाईल, त्याचाच निवडणुकीनंतर त्या पदावर दावा राहील. यदाकदाचित, भाजपची पीछेहाट होऊन शिवसेनेची सरशी झाली, तर मुख्यमंत्रीपदावर सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद अत्यल्प कालावधीसाठी मिळालेल्या व्यक्तीचा दावा अधिक प्रबळ राहतो, असे शिवसैनिक खासगीत बोलत आहेत.