शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:54 IST

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला. 

ठळक मुद्देटिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्नवृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता - डॉ. अनिल काकोडकर

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत टिटवाळा, रुंदे येथे सुरु असलेल्या “देवराई” या वनीकरण प्रकल्पाला १२ जानेवारी २०१८ रोजी १ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने नुकतेच रुंदे येथे एक स्नेहमेळावा आयोजित केला गेला होता. वेळी उपस्थित सर्व लोक, प्रमुख पाहुणे आणि ग्रीन लव्हर्स क्लबच्या सभासदांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. 

      या कार्यक्रमाला एन्व्हायरो विजीलचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर आणि डॉ. रघुनंदन आठल्ये, निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ  अनिल काकोडकर, मुख्य वनसरंक्षक, (ठाणे) राजेंद्र कदम) आणि पर्यावरण दक्षता

मंडळाच्या सचिव सीमा जोशी मान्यवर उपस्थित होते. 

सचिव सीमा जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती आणि पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “जंगल म्हणजे केवळ झाडे लावणे नसून आपली परिसंस्था जपणे असे आहे.” हे सांगून नदीकिनारी देशी बाभळीची झाडे लावावीत असे सुचविले. निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे यांनी आत्तापर्यंत लावलेल्या झाडांच्या वाढीबद्दल सांगून

येत्या ४-५ वर्षात आपण या झाडांच्या सावलीत निवांतपणे विश्रांती घेऊ शकतो असे सांगून क्षेत्रपरिसरात ज्या मोकळ्या जागा आहेत तेथे या वर्षात झाडे लावण्याचे आणि ती वाढवण्याचे प्रयोजन आहे असे सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी या उपक्रमासाठी संस्थेचे अभिनंदन करुन “या ठिकाणी एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता” असे सुचवले. या प्रकल्पांच्या माध्यमातून येथे राहणाऱ्या

स्थानिक लोकांसाठी व्यवसाय सुरु करु शकतो असेही सांगितले. यानंतर “आपलं पर्यावरण” या मासिकाचे तसेच देवराई प्रकल्पात वर्षभरात पूर्ण केलेल्या कामाच्या

पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर देवराई प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक श्री. सुहास पवार यांनी “देवराई हे एक मानवनिर्मित जंगल असून येथे जास्तीत जास्त प्रमाणात देशी वृक्षांची लागवड केलेली असून यापुढेही अशाच वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले. यानंतर डॉ. विकास हजिरनीस यांनी “जंगल आपल्याला अंतर्मुख करायला शिकवते त्यामुळे ही वनश्री

शहराला जोडून त्याबाबत स्थानिक लोकांना त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे असे सांगितले. प्रा. विद्याधर वालावलकर यांनी या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. रुंदे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर सर्वांनी पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या मामणोली येथे सुरु असलेल्या संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील प्रकल्पांची माहिती मिळविली.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईenvironmentवातावरण