शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:54 IST

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला. 

ठळक मुद्देटिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्नवृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता - डॉ. अनिल काकोडकर

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत टिटवाळा, रुंदे येथे सुरु असलेल्या “देवराई” या वनीकरण प्रकल्पाला १२ जानेवारी २०१८ रोजी १ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने नुकतेच रुंदे येथे एक स्नेहमेळावा आयोजित केला गेला होता. वेळी उपस्थित सर्व लोक, प्रमुख पाहुणे आणि ग्रीन लव्हर्स क्लबच्या सभासदांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. 

      या कार्यक्रमाला एन्व्हायरो विजीलचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर आणि डॉ. रघुनंदन आठल्ये, निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ  अनिल काकोडकर, मुख्य वनसरंक्षक, (ठाणे) राजेंद्र कदम) आणि पर्यावरण दक्षता

मंडळाच्या सचिव सीमा जोशी मान्यवर उपस्थित होते. 

सचिव सीमा जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती आणि पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “जंगल म्हणजे केवळ झाडे लावणे नसून आपली परिसंस्था जपणे असे आहे.” हे सांगून नदीकिनारी देशी बाभळीची झाडे लावावीत असे सुचविले. निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे यांनी आत्तापर्यंत लावलेल्या झाडांच्या वाढीबद्दल सांगून

येत्या ४-५ वर्षात आपण या झाडांच्या सावलीत निवांतपणे विश्रांती घेऊ शकतो असे सांगून क्षेत्रपरिसरात ज्या मोकळ्या जागा आहेत तेथे या वर्षात झाडे लावण्याचे आणि ती वाढवण्याचे प्रयोजन आहे असे सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी या उपक्रमासाठी संस्थेचे अभिनंदन करुन “या ठिकाणी एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता” असे सुचवले. या प्रकल्पांच्या माध्यमातून येथे राहणाऱ्या

स्थानिक लोकांसाठी व्यवसाय सुरु करु शकतो असेही सांगितले. यानंतर “आपलं पर्यावरण” या मासिकाचे तसेच देवराई प्रकल्पात वर्षभरात पूर्ण केलेल्या कामाच्या

पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर देवराई प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक श्री. सुहास पवार यांनी “देवराई हे एक मानवनिर्मित जंगल असून येथे जास्तीत जास्त प्रमाणात देशी वृक्षांची लागवड केलेली असून यापुढेही अशाच वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले. यानंतर डॉ. विकास हजिरनीस यांनी “जंगल आपल्याला अंतर्मुख करायला शिकवते त्यामुळे ही वनश्री

शहराला जोडून त्याबाबत स्थानिक लोकांना त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे असे सांगितले. प्रा. विद्याधर वालावलकर यांनी या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. रुंदे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर सर्वांनी पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या मामणोली येथे सुरु असलेल्या संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील प्रकल्पांची माहिती मिळविली.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईenvironmentवातावरण