शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:54 IST

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला. 

ठळक मुद्देटिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्नवृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता - डॉ. अनिल काकोडकर

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत टिटवाळा, रुंदे येथे सुरु असलेल्या “देवराई” या वनीकरण प्रकल्पाला १२ जानेवारी २०१८ रोजी १ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने नुकतेच रुंदे येथे एक स्नेहमेळावा आयोजित केला गेला होता. वेळी उपस्थित सर्व लोक, प्रमुख पाहुणे आणि ग्रीन लव्हर्स क्लबच्या सभासदांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. 

      या कार्यक्रमाला एन्व्हायरो विजीलचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर आणि डॉ. रघुनंदन आठल्ये, निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ  अनिल काकोडकर, मुख्य वनसरंक्षक, (ठाणे) राजेंद्र कदम) आणि पर्यावरण दक्षता

मंडळाच्या सचिव सीमा जोशी मान्यवर उपस्थित होते. 

सचिव सीमा जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती आणि पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “जंगल म्हणजे केवळ झाडे लावणे नसून आपली परिसंस्था जपणे असे आहे.” हे सांगून नदीकिनारी देशी बाभळीची झाडे लावावीत असे सुचविले. निवृत्त उपवन संरक्षक अनिल ठाकरे यांनी आत्तापर्यंत लावलेल्या झाडांच्या वाढीबद्दल सांगून

येत्या ४-५ वर्षात आपण या झाडांच्या सावलीत निवांतपणे विश्रांती घेऊ शकतो असे सांगून क्षेत्रपरिसरात ज्या मोकळ्या जागा आहेत तेथे या वर्षात झाडे लावण्याचे आणि ती वाढवण्याचे प्रयोजन आहे असे सांगितले. डॉ. अनिल काकोडकर यांनी या उपक्रमासाठी संस्थेचे अभिनंदन करुन “या ठिकाणी एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता” असे सुचवले. या प्रकल्पांच्या माध्यमातून येथे राहणाऱ्या

स्थानिक लोकांसाठी व्यवसाय सुरु करु शकतो असेही सांगितले. यानंतर “आपलं पर्यावरण” या मासिकाचे तसेच देवराई प्रकल्पात वर्षभरात पूर्ण केलेल्या कामाच्या

पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर देवराई प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक श्री. सुहास पवार यांनी “देवराई हे एक मानवनिर्मित जंगल असून येथे जास्तीत जास्त प्रमाणात देशी वृक्षांची लागवड केलेली असून यापुढेही अशाच वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले. यानंतर डॉ. विकास हजिरनीस यांनी “जंगल आपल्याला अंतर्मुख करायला शिकवते त्यामुळे ही वनश्री

शहराला जोडून त्याबाबत स्थानिक लोकांना त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे असे सांगितले. प्रा. विद्याधर वालावलकर यांनी या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. रुंदे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर सर्वांनी पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या मामणोली येथे सुरु असलेल्या संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील प्रकल्पांची माहिती मिळविली.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईenvironmentवातावरण