शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

लोकशाहीची हत्या आज झाली, जनताच योग्य निर्णय देईल - जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Updated: January 10, 2024 20:48 IST

शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला.

ठाणे : आजचा निकाल हास्यास्पद असाच आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आज ढसाढसा रडले आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल येणार हे आधीच माहीत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधाभास आढळत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शिवसेना नक्कीच पुन्हा न्यायालयात धाव घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पक्षांतर बंदीच्या कायद्याला हरताळ फसण्यात आला आहे. मात्र आता महाराष्ट्रातील जनतेचा निकाल घेतला जाणार आहे. पक्ष कोणी फोडला हे जनतेला नक्कीच माहित आहे, बाळासाहेबांचे उत्तरधिकारी कोण आहे, हे देखील जनतेला माहित आहे. त्यामुळे आता जनताच योग्य निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना