शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी, गेगाव आणि गायरानपाडा गावकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:02 IST

शहापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यावर तात्पुरता मार्ग म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यावर तात्पुरता मार्ग म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. त्यामुळे तो दररोज आणि पुरेशा प्रमाणात करण्याची नागरिकांची मागणी आहे.तालुक्यातील पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या गावांमध्ये वाढ झाली असून एक गाव गेगाव आणि गायरानपाडा या दोन्ही गावांच्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. सध्या गायरानपाड्याला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, या गायरानपाड्याला दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

गेगावातही टंचाईची समस्या निर्माण झाली असून या गावाची विहीर कोरडीठाक पडल्याने याही गावाला टँकरने पाणी पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही ही मागणी मान्य झालेली नाही. ती मान्य करून दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून यावेळी करण्यात आली आहे.

सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला यंदा पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. आजूबाजूला असलेल्या गावांना कधीही पाणीटंचाई निर्माण झाली, तरी गेगाववासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नव्हता. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावाला पाणीसमस्या सहसा जाणवत नव्हती. मात्र, यंदा लवकर गेलेल्या पावसाने ही समस्या निर्माण झाली आहे. यंदा तोही वेळेवर पडेलच, याची शाश्वती नसल्याने यावर्षी अधिक प्रमाणात पाणीसमस्या निर्माण होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तो दररोज आणि पुरेसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

गायरानपाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, तो दोनतीन दिवसांऐवजी दररोज करण्यात यावा, तसेच गेगावाला तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. - रमेश हुकमाळे, सेवा सोसायटी, उपाध्यक्ष

गेगाव येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर, मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. - नथू धोंडू पानसरे

ज्या गावांना पाणीसमस्या निर्माण झाली आहे, त्यांनी ग्रामपंचायतीचे ठराव दिल्यास त्यांना टँकरने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ते ठराव मंजुरीसाठी लगेचच पाठवले जातात. - एच.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई