शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी, गेगाव आणि गायरानपाडा गावकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:02 IST

शहापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यावर तात्पुरता मार्ग म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यावर तात्पुरता मार्ग म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. त्यामुळे तो दररोज आणि पुरेशा प्रमाणात करण्याची नागरिकांची मागणी आहे.तालुक्यातील पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या गावांमध्ये वाढ झाली असून एक गाव गेगाव आणि गायरानपाडा या दोन्ही गावांच्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. सध्या गायरानपाड्याला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, या गायरानपाड्याला दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

गेगावातही टंचाईची समस्या निर्माण झाली असून या गावाची विहीर कोरडीठाक पडल्याने याही गावाला टँकरने पाणी पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही ही मागणी मान्य झालेली नाही. ती मान्य करून दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून यावेळी करण्यात आली आहे.

सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला यंदा पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. आजूबाजूला असलेल्या गावांना कधीही पाणीटंचाई निर्माण झाली, तरी गेगाववासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नव्हता. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावाला पाणीसमस्या सहसा जाणवत नव्हती. मात्र, यंदा लवकर गेलेल्या पावसाने ही समस्या निर्माण झाली आहे. यंदा तोही वेळेवर पडेलच, याची शाश्वती नसल्याने यावर्षी अधिक प्रमाणात पाणीसमस्या निर्माण होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तो दररोज आणि पुरेसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

गायरानपाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, तो दोनतीन दिवसांऐवजी दररोज करण्यात यावा, तसेच गेगावाला तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. - रमेश हुकमाळे, सेवा सोसायटी, उपाध्यक्ष

गेगाव येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर, मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. - नथू धोंडू पानसरे

ज्या गावांना पाणीसमस्या निर्माण झाली आहे, त्यांनी ग्रामपंचायतीचे ठराव दिल्यास त्यांना टँकरने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ते ठराव मंजुरीसाठी लगेचच पाठवले जातात. - एच.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई