शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

श्वान निर्बिजीकरण प्रकल्पामुळे झोपमोड, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे रहिवाशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:56 IST

कल्याण : पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात आणण्यात येणाºया कुत्र्यांच्या भूंकण्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड होते.

कल्याण : पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात आणण्यात येणाºया कुत्र्यांच्या भूंकण्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड होते. तसेच प्रकल्पातील दुर्गंधीचा सामनाही त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहरापासून दूर ठिकाणी हलवावा, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार महापालिका हद्दीत १९ हजार ६ भटके कुत्रे आहेत. या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मागवलेल्या निवेदाला हैद्राबाद येथील ‘व्हेट्स सोसायटी फॉर अ‍ॅनिमल वेल्फेअर अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ या संस्थेने प्रतिसाद दिला. ८ जानेवारी २०१५ पासून ही संस्था महापलिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करत आहे. या कामासाठी संस्थेला निर्बिजीकरणापोटी महापालिकेकडून वर्षाकाठी ८० ते ९० लाख रुपये दिले जातात. आतापर्यंत संस्थेने १६ हजार ५१८ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. प्रत्यक्षात २०१२ मधील कुत्र्यांच्या गणणेनुसार अजूनही २ हजार ५९२ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण बाकी आहे. कंपनीने साधरणत: वर्षाला सरसरी अडीच हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच हा प्रकल्प आहे. निर्बिजीकरणासाठी येथे कुत्रे पकडून आणले जातात. कुत्र्यांचे येथे भुंकणे सुरु असते. रात्रीच्या वेळी त्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रहिवाशांची झोपमोड होते. दुर्गंधीचा त्रासही त्यांना सहन करावा लागतो. श्वान निर्बिजीकरण प्रकल्प येथू हटवून शहराबाहेर न्यावा, अशी मागणी सूर्यमूखी, लोक सुरभी सोसायटीतील सदनिकाधारकांनी एप्रिलमध्ये निविदेद्वारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे केली आहे. त्यावर प्रशासनाने अजूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.जनता दरबारातही मुद्दासोसायटीमधील रहिवासी हमीद शेख व सल्लाद्दीन खाटीक यांनी हा प्रश्न महापालिकेच्या जनता दरबारातही मांडला होता. त्यालाही प्रशासनाने दाद दिली नाही. या प्रकल्पाचा त्रास या परिसरातील रहेजा कॉम्पलेक्स, लोक उद्यान, शिव समृद्धी, चंद्रमुखी, सर्वोदय या सोसायट्यांमधील रहिवाशांना देखील होत आहे.श्वान प्रकल्पाच्या दुर्गंधीचा सामाना प्रकल्पाशेजारी असलेल्या बाजार समितीमधील फूल मार्केट, अन्नाधान्य बाजारालाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर कल्याण-शीळ रोडवरून मार्गक्रमण करणारे वाहन चालक व प्रवाशांनाही नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शहराच्या बाहेर हा प्रकल्प असावा, अशी मागणी रहिवासी वर्गाकडून केली जात आहे.

टॅग्स :dogकुत्राkdmcकल्याण डोंबिवली महापालिका