शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

एमआयडीसीच हटवण्याची मागणी!

By admin | Updated: March 6, 2016 01:55 IST

औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत दोन कंपन्या जळाल्यानंतर राजकीय नेत्यांनी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) शहरापासून दूर हटवण्याची आणि रासायनिक कंपन्यांची तपासणी

कल्याण : औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत दोन कंपन्या जळाल्यानंतर राजकीय नेत्यांनी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) शहरापासून दूर हटवण्याची आणि रासायनिक कंपन्यांची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने त्याचा अहवाल आल्यावरच संबंधितांवर गुन्हे दाखल करू आणि कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.अल्ट्रा प्युअर केम कंपनीला आणि जागृती केमिकलला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे अधिकारी, आग नियंत्रण तज्ज्ञांकडून त्यांचा अहवाल येईल. त्यात आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होईल. त्यानंतर, संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करू, असे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी सांगितले.चौकशी करून कारवाई : रवींद्रनया आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजलेले नाही. ती का लागली, याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सांगितले.प्रदूषण विभागाची चौकशी करा !औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही. मुळात, या गंभीर गोष्टींवर त्यांचे नियंत्रण नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा याला जबाबदार असल्याचा ठपका ठेवून त्यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यातील दोषींवरही कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.कंपन्याच हटवा : या आगीमुळे प्रश्न नेहमी पडतो की, या कंपन्यांना मार्च महिन्यातच आग कशी काय लागते? तसेच अधिकृत नागरी वस्त्यांना खेटून असलेल्या, सर्व नियमांचा भंग करून व प्रदूषण करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या रासायनिक कंपन्या धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य सरकारने इतरत्र हलवाव्या, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी केली. यातून काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, हे मान्य आहे. पण, नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाचा विचार केला, तर त्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे, असेही त्यांनी सुचविले.तपासणीच नाही : म्हात्रेऔद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर कधीच येऊन तपासणी करत नाहीत. बहुतांश कंपन्यांत टेक्निशियन नाही. त्यामुळे कंपन्यांत कामगारांच्या जीवाशी खेळण्याचे काम येथील सर्वच मोठ्या रासायनिक कंपन्यांत सुरू आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ग्रामीणचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी केला.