शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

एमआयडीसीच हटवण्याची मागणी!

By admin | Updated: March 6, 2016 01:55 IST

औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत दोन कंपन्या जळाल्यानंतर राजकीय नेत्यांनी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) शहरापासून दूर हटवण्याची आणि रासायनिक कंपन्यांची तपासणी

कल्याण : औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत दोन कंपन्या जळाल्यानंतर राजकीय नेत्यांनी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) शहरापासून दूर हटवण्याची आणि रासायनिक कंपन्यांची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने त्याचा अहवाल आल्यावरच संबंधितांवर गुन्हे दाखल करू आणि कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.अल्ट्रा प्युअर केम कंपनीला आणि जागृती केमिकलला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे अधिकारी, आग नियंत्रण तज्ज्ञांकडून त्यांचा अहवाल येईल. त्यात आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होईल. त्यानंतर, संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करू, असे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी सांगितले.चौकशी करून कारवाई : रवींद्रनया आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजलेले नाही. ती का लागली, याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सांगितले.प्रदूषण विभागाची चौकशी करा !औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही. मुळात, या गंभीर गोष्टींवर त्यांचे नियंत्रण नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा याला जबाबदार असल्याचा ठपका ठेवून त्यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यातील दोषींवरही कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.कंपन्याच हटवा : या आगीमुळे प्रश्न नेहमी पडतो की, या कंपन्यांना मार्च महिन्यातच आग कशी काय लागते? तसेच अधिकृत नागरी वस्त्यांना खेटून असलेल्या, सर्व नियमांचा भंग करून व प्रदूषण करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या रासायनिक कंपन्या धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य सरकारने इतरत्र हलवाव्या, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी केली. यातून काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, हे मान्य आहे. पण, नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाचा विचार केला, तर त्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे, असेही त्यांनी सुचविले.तपासणीच नाही : म्हात्रेऔद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर कधीच येऊन तपासणी करत नाहीत. बहुतांश कंपन्यांत टेक्निशियन नाही. त्यामुळे कंपन्यांत कामगारांच्या जीवाशी खेळण्याचे काम येथील सर्वच मोठ्या रासायनिक कंपन्यांत सुरू आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ग्रामीणचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी केला.