शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार दावे प्रलंबित, न्यायप्राधिकरणाचे बेंच वाढवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 03:25 IST

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

- मुरलीधर भवारकल्याण : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, रेल्वे अपघात दावा न्यायप्राधिकरणाचे एकच बेंच असून त्यांच्याकडे पाच वर्षांतील सहा हजार दावे प्रलंबित आहेत. भरपाईची रक्कम वाढवली असली तरी दावे फेटाळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान, न्यायप्राधिकरणाचे बेंच वाढवल्यास दावे निकाली निघण्याचे प्रमाण वाढू शकते.मध्य व पश्चिम मार्गावरील उपनगरी लोकलने दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेवरील पाच व सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. ते २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कल्याण येथे टर्मिनस नसल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे उपनगरी गाड्यांचा खोळंबा होतो. लोकलच्या फेऱ्या वाढवता येत नाहीत. लोकलना सकाळ व सायंकाळी प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागतो. त्यामुळे उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज किमान पाच तर कमाल १५ अपघात होतात. त्यात प्रवासी जखमी होतात, तर बहुतांशी त्यांचा मृत्यू होतो. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना यापूर्वी चार लाख रुपयांची भरपाई दिली जात होती.रेल्वे अपघात दावा न्यायप्राधिकरण मुंबई येथे आहे. या प्राधिकरणाकडून दावा निकाली लागल्यानंतर मदत दिली जाते. मात्र, ही मदत अपुरी आहे. रेल्वे व्यवस्थापकला काही वर्षांपूर्वी २५ हजार रुपये पगार होता. आता तो दोन लाखांच्या घरात गेला आहे. महागाई वाढली आहे. हा रेष लक्षात घेता अपघातात मृत्यू होणाºया प्रवाशांच्या भरपाईच्या रक्कमेत १० लाखांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे माजी अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केली होती. प्रशासनाने महासंघाची मागणी विचारात घेता भरपाईची रक्कम चार लाखांवरून आठ लाखांपर्यंत वाढवली. त्याची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून सुरू केली आहे.न्याय प्राधिकरणाकडे जानेवारी २०१२ ते २०१७ या कालावधीतील अपघात झालेल्यांचे सहा हजार भरपाईचे दावे आहेत. ते आता सुनावणीसाठी बोर्डावर येणे सुरू झाले आहेत. सुनावणीनंतर दावे निकाली निघण्याचे प्रमाण महिन्याला ३० ते ४० इतकेच आहे.महिन्याला किमान ३० दावे निकाली निघाले तर वर्षाला ३६० दावे निकाली निघतात. या वरून सहा हजार दावे निकाली निघण्यासाठी १७ वर्षे लागू शकतात. भरपाईची रक्कम दुप्पट झाली असली तरी दावे किरकोळ कारणाने फेटाळण्याचे प्रमाण वाढले आहे.दरम्यान, अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांतच भरपाईची रक्कम मिळाली तर त्यांना आधार मिळू शकतो. दावे निकाली निघण्यास पाच ते सहा वर्षे लागत असतील तर, त्यांना मिळालेल्या मदतीचा काहीच उपयोग होत नाही. अनेकदा दावा दाखल करणारी व्यक्तीही पाठपुरावा सोडून देते.>खासदारांनी लक्ष घालणे आवश्यकन्यायप्राधिकरणाच्या बेंचकडे मुंबई, मनमाड आणि पुणे परिसरातील रेल्वे अपघातांत मृत्यू झालेल्यांचे दावे सुनावणीसाठी येतात. त्यामुळे बेंचवर कामाचा ताण आहे. बेंचची संख्या तीनपर्यंत वाढवल्यास मुंबई, मनमाड आणि पुणे यांना स्वतंत्र बेंच मिळेल. दावे निकाली निघण्याचे प्रमाण वाढेल, याकडे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने लक्ष वेधले आहे. खासदारांनी ही मागणी उचलून धरल्यास रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जाऊ शकते.