शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

सहा हजार दावे प्रलंबित, न्यायप्राधिकरणाचे बेंच वाढवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 03:25 IST

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

- मुरलीधर भवारकल्याण : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, रेल्वे अपघात दावा न्यायप्राधिकरणाचे एकच बेंच असून त्यांच्याकडे पाच वर्षांतील सहा हजार दावे प्रलंबित आहेत. भरपाईची रक्कम वाढवली असली तरी दावे फेटाळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान, न्यायप्राधिकरणाचे बेंच वाढवल्यास दावे निकाली निघण्याचे प्रमाण वाढू शकते.मध्य व पश्चिम मार्गावरील उपनगरी लोकलने दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेवरील पाच व सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. ते २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कल्याण येथे टर्मिनस नसल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे उपनगरी गाड्यांचा खोळंबा होतो. लोकलच्या फेऱ्या वाढवता येत नाहीत. लोकलना सकाळ व सायंकाळी प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागतो. त्यामुळे उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज किमान पाच तर कमाल १५ अपघात होतात. त्यात प्रवासी जखमी होतात, तर बहुतांशी त्यांचा मृत्यू होतो. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना यापूर्वी चार लाख रुपयांची भरपाई दिली जात होती.रेल्वे अपघात दावा न्यायप्राधिकरण मुंबई येथे आहे. या प्राधिकरणाकडून दावा निकाली लागल्यानंतर मदत दिली जाते. मात्र, ही मदत अपुरी आहे. रेल्वे व्यवस्थापकला काही वर्षांपूर्वी २५ हजार रुपये पगार होता. आता तो दोन लाखांच्या घरात गेला आहे. महागाई वाढली आहे. हा रेष लक्षात घेता अपघातात मृत्यू होणाºया प्रवाशांच्या भरपाईच्या रक्कमेत १० लाखांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे माजी अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केली होती. प्रशासनाने महासंघाची मागणी विचारात घेता भरपाईची रक्कम चार लाखांवरून आठ लाखांपर्यंत वाढवली. त्याची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून सुरू केली आहे.न्याय प्राधिकरणाकडे जानेवारी २०१२ ते २०१७ या कालावधीतील अपघात झालेल्यांचे सहा हजार भरपाईचे दावे आहेत. ते आता सुनावणीसाठी बोर्डावर येणे सुरू झाले आहेत. सुनावणीनंतर दावे निकाली निघण्याचे प्रमाण महिन्याला ३० ते ४० इतकेच आहे.महिन्याला किमान ३० दावे निकाली निघाले तर वर्षाला ३६० दावे निकाली निघतात. या वरून सहा हजार दावे निकाली निघण्यासाठी १७ वर्षे लागू शकतात. भरपाईची रक्कम दुप्पट झाली असली तरी दावे किरकोळ कारणाने फेटाळण्याचे प्रमाण वाढले आहे.दरम्यान, अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांतच भरपाईची रक्कम मिळाली तर त्यांना आधार मिळू शकतो. दावे निकाली निघण्यास पाच ते सहा वर्षे लागत असतील तर, त्यांना मिळालेल्या मदतीचा काहीच उपयोग होत नाही. अनेकदा दावा दाखल करणारी व्यक्तीही पाठपुरावा सोडून देते.>खासदारांनी लक्ष घालणे आवश्यकन्यायप्राधिकरणाच्या बेंचकडे मुंबई, मनमाड आणि पुणे परिसरातील रेल्वे अपघातांत मृत्यू झालेल्यांचे दावे सुनावणीसाठी येतात. त्यामुळे बेंचवर कामाचा ताण आहे. बेंचची संख्या तीनपर्यंत वाढवल्यास मुंबई, मनमाड आणि पुणे यांना स्वतंत्र बेंच मिळेल. दावे निकाली निघण्याचे प्रमाण वाढेल, याकडे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने लक्ष वेधले आहे. खासदारांनी ही मागणी उचलून धरल्यास रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जाऊ शकते.