शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जीएसटीमुळे प्रचार साहित्याची मागणी घटली, यंदा मनसेचं निवडणूक साहित्य पडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 01:32 IST

व्यावसायिकांचा हिरमोड । युती आणि आघाडी झाल्याने विक्रीवर परिणाम

अजित मांडके 

ठाणे : एकीकडे युती होऊ नये... आघाडी झाली नाही तर बरेच, असे अनेक इच्छुकांना लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी वाटत होते; परंतु श्रेष्ठींपुढे त्यांचे काही चालले नाही. युती आणि आघाडीसुद्धा झाल्याने अनेक इच्छुकांचे अवसान गळाले आहे. या इच्छुकांसोबतच निवडणुकीच्या काळात झेंडे, बॅनर, पोस्टर्स आदी प्रचार साहित्य बनवणाऱ्या व्यावसायिकांचासुद्धा हिरमोड झाला. त्यांनी प्रत्येक पक्षासाठी लागणारे निवडणूक साहित्य तयार केले होते; परंतु युती आणि आघाडीचेही सूत जुळल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला असून, त्याआधीच तयार केलेल्या साहित्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. दुसरीकडे, जीएसटीमुळे प्रचार साहित्यामधील प्रत्येक वस्तू दोन रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत महागली आहे. घटलेली मागणी आणि जीएसटीमुळे वाढलेले भाव, यामुळे प्रचार साहित्याच्या विक्रीमध्ये ४० टक्के घट झाली आहे.

ठाण्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्टÑवादीचे उमेदवार ८ एप्रिलला रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या सभा, मेळावे, रॅली यासाठी लागणाºया निवडणूक साहित्याची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यात तसे एकही प्रचार साहित्यविक्रीचे स्वतंत्र दुकान लागलेले नाही; परंतु वागळे इस्टेटमधील एका गोडाउनमध्ये सध्या साहित्याची विक्री सुरू आहे. येथे आठ ते दहा कर्मचारी कामाला आहेत. सध्या निवडणूक साहित्याच्या या बाजारात टोप्या, बॅजेस, रबरबॅण्ड, मफलर, कटआउट आदींसह प्लायचे कटाउट हे सध्या ठाण्यात चर्चेचा विषय आहे.मागील विधानसभा आणि त्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युती तसेच आघाडी झाली नव्हती. त्यामुळे त्याचा फायदा या विक्रेत्यांना झाला होता. त्यांच्या उत्पन्नात बºयापैकी वाढ झाली होती. आतासुद्धा लोकसभा निवडणुकीत हे सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असा या विक्रेत्यांचा अंदाज होता. परंतु, तसे काही घडलेच नाही. शिवसेना आणि भाजपाची युती झाली; सोबतच काँग्रेस आणि राष्टÑवादीची आघाडीही झाली. त्यामुळे याचा फटका या विक्रेत्यांना बसला आहे. युती किंवा आघाडी होणार नाही, हे गृहीत धरून त्यांनी आधीपासूनच प्रचार साहित्य तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. युती आणि आघाडी झाल्याने इतर साहित्याचे करायचे काय, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.

जीएसटीमुळे वाढल्या किमतीजीएसटीचा फटका निवडणूक साहित्यविक्री करणाऱ्यांनासुद्धा बसला आहे. पूर्वी टोपी पाच रुपयांना मिळत होती. आता ती सात रुपये झाली आहे. रबरबॅण्ड पाच, बॅजेस सात रुपये, मफलर १२ ते १५ रुपये, टी-शर्ट ७० रुपये आणि प्लायचे कटआउट १५० ते २०० रुपयांना विकले जात आहे. प्रचारासाठी लागणारे वाहन प्रतिदिन २० हजार रुपये दराने उपलब्ध राहणार आहे. यावेळी उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन, टोप्यांची मागणी वाढली असल्याचे विक्रेते संजय सुतार यांनी सांगितले.मनसेचे निवडणूक साहित्य पडूनया निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून मनसेकडेसुद्धा पाहिले जात होते. हा पक्ष लोकसभा निवडणूक लढवेल, या अपेक्षेने त्यांचेसुद्धा प्रचार साहित्य तयार करण्यात आले होते. यामध्ये भाजप विरुद्ध हॅण्ड कटाउटची संख्या जास्त होती. परंतु, मनसेने निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले साहित्य तसेच पडून राहिले आहे.

ताई, माई, अक्काची जागा घेतली अंकल आणि आण्टीनेपूर्वी प्रचारात ताई, माई, अक्का रंगत भरत होत्या. त्या टोपी, बॅजेस, मफलर आदी प्रचार साहित्य आवडीने वापराच्या. आता त्यांची जागा सुशिक्षित अंकल, आण्टी आणि तरुणांनी घेतली आहे. त्यांना अशा प्रकारचे प्रचार साहित्य वापरण्यात फार रस नाही. त्यामुळेही निवडणूक साहित्याच्या विक्रीत घट झाली आहे. एकूणच या सर्वांचा परिणाम होऊन, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये ४० टक्कयांची घट झाली आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक