शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जीएसटीमुळे प्रचार साहित्याची मागणी घटली, यंदा मनसेचं निवडणूक साहित्य पडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 01:32 IST

व्यावसायिकांचा हिरमोड । युती आणि आघाडी झाल्याने विक्रीवर परिणाम

अजित मांडके 

ठाणे : एकीकडे युती होऊ नये... आघाडी झाली नाही तर बरेच, असे अनेक इच्छुकांना लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी वाटत होते; परंतु श्रेष्ठींपुढे त्यांचे काही चालले नाही. युती आणि आघाडीसुद्धा झाल्याने अनेक इच्छुकांचे अवसान गळाले आहे. या इच्छुकांसोबतच निवडणुकीच्या काळात झेंडे, बॅनर, पोस्टर्स आदी प्रचार साहित्य बनवणाऱ्या व्यावसायिकांचासुद्धा हिरमोड झाला. त्यांनी प्रत्येक पक्षासाठी लागणारे निवडणूक साहित्य तयार केले होते; परंतु युती आणि आघाडीचेही सूत जुळल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला असून, त्याआधीच तयार केलेल्या साहित्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. दुसरीकडे, जीएसटीमुळे प्रचार साहित्यामधील प्रत्येक वस्तू दोन रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत महागली आहे. घटलेली मागणी आणि जीएसटीमुळे वाढलेले भाव, यामुळे प्रचार साहित्याच्या विक्रीमध्ये ४० टक्के घट झाली आहे.

ठाण्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्टÑवादीचे उमेदवार ८ एप्रिलला रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या सभा, मेळावे, रॅली यासाठी लागणाºया निवडणूक साहित्याची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यात तसे एकही प्रचार साहित्यविक्रीचे स्वतंत्र दुकान लागलेले नाही; परंतु वागळे इस्टेटमधील एका गोडाउनमध्ये सध्या साहित्याची विक्री सुरू आहे. येथे आठ ते दहा कर्मचारी कामाला आहेत. सध्या निवडणूक साहित्याच्या या बाजारात टोप्या, बॅजेस, रबरबॅण्ड, मफलर, कटआउट आदींसह प्लायचे कटाउट हे सध्या ठाण्यात चर्चेचा विषय आहे.मागील विधानसभा आणि त्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युती तसेच आघाडी झाली नव्हती. त्यामुळे त्याचा फायदा या विक्रेत्यांना झाला होता. त्यांच्या उत्पन्नात बºयापैकी वाढ झाली होती. आतासुद्धा लोकसभा निवडणुकीत हे सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असा या विक्रेत्यांचा अंदाज होता. परंतु, तसे काही घडलेच नाही. शिवसेना आणि भाजपाची युती झाली; सोबतच काँग्रेस आणि राष्टÑवादीची आघाडीही झाली. त्यामुळे याचा फटका या विक्रेत्यांना बसला आहे. युती किंवा आघाडी होणार नाही, हे गृहीत धरून त्यांनी आधीपासूनच प्रचार साहित्य तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. युती आणि आघाडी झाल्याने इतर साहित्याचे करायचे काय, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.

जीएसटीमुळे वाढल्या किमतीजीएसटीचा फटका निवडणूक साहित्यविक्री करणाऱ्यांनासुद्धा बसला आहे. पूर्वी टोपी पाच रुपयांना मिळत होती. आता ती सात रुपये झाली आहे. रबरबॅण्ड पाच, बॅजेस सात रुपये, मफलर १२ ते १५ रुपये, टी-शर्ट ७० रुपये आणि प्लायचे कटआउट १५० ते २०० रुपयांना विकले जात आहे. प्रचारासाठी लागणारे वाहन प्रतिदिन २० हजार रुपये दराने उपलब्ध राहणार आहे. यावेळी उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन, टोप्यांची मागणी वाढली असल्याचे विक्रेते संजय सुतार यांनी सांगितले.मनसेचे निवडणूक साहित्य पडूनया निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून मनसेकडेसुद्धा पाहिले जात होते. हा पक्ष लोकसभा निवडणूक लढवेल, या अपेक्षेने त्यांचेसुद्धा प्रचार साहित्य तयार करण्यात आले होते. यामध्ये भाजप विरुद्ध हॅण्ड कटाउटची संख्या जास्त होती. परंतु, मनसेने निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले साहित्य तसेच पडून राहिले आहे.

ताई, माई, अक्काची जागा घेतली अंकल आणि आण्टीनेपूर्वी प्रचारात ताई, माई, अक्का रंगत भरत होत्या. त्या टोपी, बॅजेस, मफलर आदी प्रचार साहित्य आवडीने वापराच्या. आता त्यांची जागा सुशिक्षित अंकल, आण्टी आणि तरुणांनी घेतली आहे. त्यांना अशा प्रकारचे प्रचार साहित्य वापरण्यात फार रस नाही. त्यामुळेही निवडणूक साहित्याच्या विक्रीत घट झाली आहे. एकूणच या सर्वांचा परिणाम होऊन, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये ४० टक्कयांची घट झाली आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक