शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

पाण्याची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:48 IST

एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत.

ठाणे : एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. सक्रीय टँकरलॉबीकडून मिळणाºया हप्त्यांमुळे सत्ताधारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीत, असा आरोप करून पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे राष्टÑीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यासाठी धरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिकेची एकही महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सोमवारी दिला.पालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर, घोडबंदर रोड, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच भागात पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष्य आहे. पाणी सोडणारे व्हॉल्व आॅपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करीत आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे त्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.विशेष म्हणजे हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू सोसायटीच्या सेक्रेटरी अर्चना वैद्य यांनीही वर्षभर पाण्याची टंचाई भेडसावत असून टँकरशिवाय पर्यायच नसल्याचे पत्रकारांना सांगितले. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. २५ वर्षांच्या सत्तेत पाणी कुठे मुरले, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. सध्या ठाण्यात टँकरलॉबी कार्यरत आहे. सर्वच गृहसंकुलांना टँकरने पाणीपुरवठा होतो. यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. हे टँकर कोणाचे आहेत, याचे सूत्रधार कोण आहेत? याची चौकशी केली पाहिजे. मात्र, पाण्याच्या वाटपावर काहीजणांची रोजीरोटी चालत आहे; त्यातून त्यांच्या नेत्याला ‘हप्ते’ मिळत आहेत. त्यामुळेच धरण बांधले जात नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी