शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

पाण्याची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:48 IST

एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत.

ठाणे : एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. सक्रीय टँकरलॉबीकडून मिळणाºया हप्त्यांमुळे सत्ताधारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीत, असा आरोप करून पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे राष्टÑीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यासाठी धरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिकेची एकही महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सोमवारी दिला.पालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर, घोडबंदर रोड, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच भागात पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष्य आहे. पाणी सोडणारे व्हॉल्व आॅपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करीत आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे त्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.विशेष म्हणजे हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू सोसायटीच्या सेक्रेटरी अर्चना वैद्य यांनीही वर्षभर पाण्याची टंचाई भेडसावत असून टँकरशिवाय पर्यायच नसल्याचे पत्रकारांना सांगितले. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. २५ वर्षांच्या सत्तेत पाणी कुठे मुरले, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. सध्या ठाण्यात टँकरलॉबी कार्यरत आहे. सर्वच गृहसंकुलांना टँकरने पाणीपुरवठा होतो. यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. हे टँकर कोणाचे आहेत, याचे सूत्रधार कोण आहेत? याची चौकशी केली पाहिजे. मात्र, पाण्याच्या वाटपावर काहीजणांची रोजीरोटी चालत आहे; त्यातून त्यांच्या नेत्याला ‘हप्ते’ मिळत आहेत. त्यामुळेच धरण बांधले जात नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी