शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पाण्याची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:48 IST

एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत.

ठाणे : एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. सक्रीय टँकरलॉबीकडून मिळणाºया हप्त्यांमुळे सत्ताधारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीत, असा आरोप करून पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे राष्टÑीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यासाठी धरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिकेची एकही महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सोमवारी दिला.पालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर, घोडबंदर रोड, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच भागात पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष्य आहे. पाणी सोडणारे व्हॉल्व आॅपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करीत आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे त्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.विशेष म्हणजे हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू सोसायटीच्या सेक्रेटरी अर्चना वैद्य यांनीही वर्षभर पाण्याची टंचाई भेडसावत असून टँकरशिवाय पर्यायच नसल्याचे पत्रकारांना सांगितले. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. २५ वर्षांच्या सत्तेत पाणी कुठे मुरले, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. सध्या ठाण्यात टँकरलॉबी कार्यरत आहे. सर्वच गृहसंकुलांना टँकरने पाणीपुरवठा होतो. यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. हे टँकर कोणाचे आहेत, याचे सूत्रधार कोण आहेत? याची चौकशी केली पाहिजे. मात्र, पाण्याच्या वाटपावर काहीजणांची रोजीरोटी चालत आहे; त्यातून त्यांच्या नेत्याला ‘हप्ते’ मिळत आहेत. त्यामुळेच धरण बांधले जात नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी