शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:48 IST

एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत.

ठाणे : एकीकडे ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघे १८ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरीकडे घरामागे २०० रुपये पाण्याला मोजावे लागत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची मोठी टंचाई भेडसावत आहे. सक्रीय टँकरलॉबीकडून मिळणाºया हप्त्यांमुळे सत्ताधारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीत, असा आरोप करून पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे राष्टÑीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यासाठी धरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिकेची एकही महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सोमवारी दिला.पालिका क्षेत्रातील लोकमान्यनगर, घोडबंदर रोड, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या सर्वच भागात पाण्याचे प्रचंड दुर्भीक्ष्य आहे. पाणी सोडणारे व्हॉल्व आॅपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करीत आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे त्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.विशेष म्हणजे हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू सोसायटीच्या सेक्रेटरी अर्चना वैद्य यांनीही वर्षभर पाण्याची टंचाई भेडसावत असून टँकरशिवाय पर्यायच नसल्याचे पत्रकारांना सांगितले. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. २५ वर्षांच्या सत्तेत पाणी कुठे मुरले, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे. सध्या ठाण्यात टँकरलॉबी कार्यरत आहे. सर्वच गृहसंकुलांना टँकरने पाणीपुरवठा होतो. यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. हे टँकर कोणाचे आहेत, याचे सूत्रधार कोण आहेत? याची चौकशी केली पाहिजे. मात्र, पाण्याच्या वाटपावर काहीजणांची रोजीरोटी चालत आहे; त्यातून त्यांच्या नेत्याला ‘हप्ते’ मिळत आहेत. त्यामुळेच धरण बांधले जात नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी