शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

केमिकल कारखान्यावर कारवाईची मागणी उल्हासनगरातील वालधुनी नदीच्या पाण्याला दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:15 IST

 उल्हासनगरच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराची जीवनवाहिनी ऐवजी शाप ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे

 सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रातून दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री सुटलेल्या दुर्गंधीने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना डोकेदुखी, उलट्या व श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. नदी पात्रात केमिकल युक्त सांडपाणी सोडण्यात आल्याने, परिसरात दुर्गंधी सुटल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली.

 उल्हासनगरच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराची जीवनवाहिनी ऐवजी शाप ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नदी पात्रात दुसरी कडून आणलेली केमिकल युक्त सांडपाणी नदीत सर्रासपणे सोडले जात असल्याने, यापूर्वी टँकरचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नदी किनाऱ्यावरील अंबरनाथ येथील केमिकल कारखाने सांडपाणी सोडले जात असल्याने, प्रदूषण मंडळाने यापूर्वीच काही कारखान्यांना नोटिसा देऊन गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री नदी पात्रातून उग्र दर्प येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येऊन अनेक नागरिक रस्त्यावर आले. नागरिकांना श्वास घेण्यास, डोकेदुखी व उलट्या आदींचा त्रास झाल्याने संताप व्यक्त होत असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

वालधुनी नदीतील दर्पमुळे नागरिक त्रस्त असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सविता तोरणे-रगडे, गजानन शेळके व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केली. तसेच नदी किनारी रात्रीची गस्त घातल्यास टँकरने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर वचक बसणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर