शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

केमिकल कारखान्यावर कारवाईची मागणी उल्हासनगरातील वालधुनी नदीच्या पाण्याला दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:15 IST

 उल्हासनगरच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराची जीवनवाहिनी ऐवजी शाप ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे

 सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रातून दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री सुटलेल्या दुर्गंधीने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना डोकेदुखी, उलट्या व श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. नदी पात्रात केमिकल युक्त सांडपाणी सोडण्यात आल्याने, परिसरात दुर्गंधी सुटल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली.

 उल्हासनगरच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराची जीवनवाहिनी ऐवजी शाप ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नदी पात्रात दुसरी कडून आणलेली केमिकल युक्त सांडपाणी नदीत सर्रासपणे सोडले जात असल्याने, यापूर्वी टँकरचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नदी किनाऱ्यावरील अंबरनाथ येथील केमिकल कारखाने सांडपाणी सोडले जात असल्याने, प्रदूषण मंडळाने यापूर्वीच काही कारखान्यांना नोटिसा देऊन गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री नदी पात्रातून उग्र दर्प येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येऊन अनेक नागरिक रस्त्यावर आले. नागरिकांना श्वास घेण्यास, डोकेदुखी व उलट्या आदींचा त्रास झाल्याने संताप व्यक्त होत असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

वालधुनी नदीतील दर्पमुळे नागरिक त्रस्त असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सविता तोरणे-रगडे, गजानन शेळके व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केली. तसेच नदी किनारी रात्रीची गस्त घातल्यास टँकरने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर वचक बसणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर