शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:53 IST

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते.

पंकज पाटीलअंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट येणार, याची भीती सर्वांना असली तरी अंबरनाथमध्ये अद्याप रुग्णसंख्या पाहता दुसरी लाट आलेली नाही, हे उघड होत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, वाढीचे हे प्रमाण नियंत्रणात आहे. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटत आहे.

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते. कालांतराने हा आकडा अवघ्या २० ते ३० रुग्णांवर आला होता. ऑक्टाेबरमध्ये हाच आकडा १५ ते २० रुग्णांवर आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या घटलेली होती. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत घट झालेली आहे. १० ते १५ रुग्ण दिवसाला सापडत होते. रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने हा आकडा नियंत्रणात आला. दिवाळी झाल्यावर कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भीती प्रशासनाला होती. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने यंत्रणाही तयार केली होती. अतिदक्षता विभागाची संख्याही वाढवली. मात्र, रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. गेल्या आठवड्याचा अहवाल पाहता दिवसाला १५ ते २५ रुग्ण सापडण्याचे प्रमाण आहे. तरीही, अंबरनाथ शहराने ३०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे. तर, बदलापूर पालिकेने २०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे.  रुग्णसंख्या घटत असल्याने पालिकेला आपली आरोग्यव्यवस्था तत्पर ठेवण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे भविष्याच्या कोरोनालाटेच्या प्रतीक्षेत प्रशासन सतर्क दिसत आहे.

रुग्णसंख्या नियंत्रित आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही नियंत्रित आहे. सरकारच्या सतर्कतेच्या सूचनांमुळे आम्ही यंत्रणा तयार करून ठेवली आहे. याआधीही आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे काम केले आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस