शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:53 IST

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते.

पंकज पाटीलअंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट येणार, याची भीती सर्वांना असली तरी अंबरनाथमध्ये अद्याप रुग्णसंख्या पाहता दुसरी लाट आलेली नाही, हे उघड होत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, वाढीचे हे प्रमाण नियंत्रणात आहे. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटत आहे.

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते. कालांतराने हा आकडा अवघ्या २० ते ३० रुग्णांवर आला होता. ऑक्टाेबरमध्ये हाच आकडा १५ ते २० रुग्णांवर आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या घटलेली होती. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत घट झालेली आहे. १० ते १५ रुग्ण दिवसाला सापडत होते. रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने हा आकडा नियंत्रणात आला. दिवाळी झाल्यावर कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भीती प्रशासनाला होती. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने यंत्रणाही तयार केली होती. अतिदक्षता विभागाची संख्याही वाढवली. मात्र, रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. गेल्या आठवड्याचा अहवाल पाहता दिवसाला १५ ते २५ रुग्ण सापडण्याचे प्रमाण आहे. तरीही, अंबरनाथ शहराने ३०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे. तर, बदलापूर पालिकेने २०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे.  रुग्णसंख्या घटत असल्याने पालिकेला आपली आरोग्यव्यवस्था तत्पर ठेवण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे भविष्याच्या कोरोनालाटेच्या प्रतीक्षेत प्रशासन सतर्क दिसत आहे.

रुग्णसंख्या नियंत्रित आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही नियंत्रित आहे. सरकारच्या सतर्कतेच्या सूचनांमुळे आम्ही यंत्रणा तयार करून ठेवली आहे. याआधीही आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे काम केले आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस