शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:53 IST

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते.

पंकज पाटीलअंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट येणार, याची भीती सर्वांना असली तरी अंबरनाथमध्ये अद्याप रुग्णसंख्या पाहता दुसरी लाट आलेली नाही, हे उघड होत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, वाढीचे हे प्रमाण नियंत्रणात आहे. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटत आहे.

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते. कालांतराने हा आकडा अवघ्या २० ते ३० रुग्णांवर आला होता. ऑक्टाेबरमध्ये हाच आकडा १५ ते २० रुग्णांवर आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या घटलेली होती. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत घट झालेली आहे. १० ते १५ रुग्ण दिवसाला सापडत होते. रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने हा आकडा नियंत्रणात आला. दिवाळी झाल्यावर कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भीती प्रशासनाला होती. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने यंत्रणाही तयार केली होती. अतिदक्षता विभागाची संख्याही वाढवली. मात्र, रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. गेल्या आठवड्याचा अहवाल पाहता दिवसाला १५ ते २५ रुग्ण सापडण्याचे प्रमाण आहे. तरीही, अंबरनाथ शहराने ३०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे. तर, बदलापूर पालिकेने २०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे.  रुग्णसंख्या घटत असल्याने पालिकेला आपली आरोग्यव्यवस्था तत्पर ठेवण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे भविष्याच्या कोरोनालाटेच्या प्रतीक्षेत प्रशासन सतर्क दिसत आहे.

रुग्णसंख्या नियंत्रित आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही नियंत्रित आहे. सरकारच्या सतर्कतेच्या सूचनांमुळे आम्ही यंत्रणा तयार करून ठेवली आहे. याआधीही आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे काम केले आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस