शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

नगरपरिषदेची निवडणूक पॅनल पद्धतीने रद्द करून एक सदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 11:28 IST

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांच्या नगरपालिका निवडणुकीचा संभ्रम सातत्याने वाढत आहे.

अंबरनाथ - ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांच्या नगरपालिका निवडणुकीचा संभ्रम सातत्याने वाढत आहे. या दोन्ही नगरपरिषदेची निवडणूक ही पॅनल पद्धतीने होणार असे वाटत असताना राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत पॅनल पद्धती रद्द करून एक सदस्य पद्धत पुन्हा लागू केली आहे. यासंदर्भातला अध्यादेश नगर विकास विभागाने काढला असून तो आदेश पुढील कार्यवाहीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना राज्यातील नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीमध्ये पॅनल पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेमध्ये चार वॉर्डांचे मिळून एक पॅनल तर नगर परिषदेमध्ये दोन वॉर्डांचे मिळून एक पॅनल तयार करण्याची ची प्रक्रिया होती. मात्र राज्यात शासन बदलल्यावर लागलीच पॅनल पद्धती रद्द करण्याची चर्चा रंगली होती. सरकारच्या हिवाळी अधिवेशनात महापालिकांमधील पॅनल पद्धती रद्द करण्यासंदर्भात निर्णय देखील झाला होता. मात्र राज्यातील नगरपरिषदांमध्ये  नेमकी कोणत्या पद्धतीने निवडणूक होणार याबाबत संभ्रम कायम होता. ठाणे जिल्ह्यातील दोन नगरपरिषद सह राज्यातील राजगुरूनगर, भडगाव, भोकर, मोवड, वरणगाव आणि वाडी या 8 नगरपरिषदांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत.  

निवडणुकीच्या प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम देखील जाहीर केला होता. त्यानुसार संबंधित नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचना तयार देखील केल्या होत्या. या प्रभागरचना 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होते. मात्र एक दिवस आधीच म्हणजे 23 जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश काढत 24 जानेवारी ची अधिसूचना जाहीर करण्याची तारीख रद्द ठरवली, तसेच निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा आदेश देखील स्थगित केला. त्यामुळे या नगर परिषद यांचा निवडणुकीचा गोंधळ वाढला होता. त्यातच 27 जानेवारी रोजी राज्य शासनाने नवीन आदेश पारित केले असून या आदेशात नगरपरिषद क्षेत्रात देखील एक सदस्य पद्धतीने निवडणूक घेण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णय संदर्भातली अध्यादेश काढण्यात आला आहे. हा अध्यादेश पुढील निवडणूक कार्य कालासाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग पुढील आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करणार आहे.

दुसरीकडे एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्याचा कायदा मंजूर होण्याआधीच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला असताना राज्याच्या निर्णयाची अंमलबजावणी या निवडणुकीत करावी की नाही याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र निवडणूक आयोगाने आपलेच आदेश स्थगित केल्याने निवडणूक आयोग हे नवीन आदेश स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने हे आदेश स्वीकारल्यास त्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी अंबरनाथ आणि बदलापूर मधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाambernathअंबरनाथElectionनिवडणूकthaneठाणे