शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय मान्य, पण मंदिर भूमिपूजनाची घाई नको...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 03:35 IST

मुंब्रा येथील रहिवाशांच्या प्रतिक्रिया : कोरोना संकटाच्या काळात थांबायला हवे!

कुमार बडदेमुंब्रा : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे, याबद्दल आनंद आहे. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले असून, ८० टक्के लोकांनी रोजगार गमावला असताना भूमिपूजनाची घाई योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिल्या.सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. अशावेळी राम मंदिराचे भूमिपूजन करणे चुकीचे आहे. भूमिपूजनाऐवजी सरकारने कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना पुन्हा रोजगार कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आजही देशातील ८० टक्के नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. ती सावरण्यासाठी त्यांना कशी आर्थिक मदत देता येईल, देशातील बंद असलेले उद्योगधंदे पुन्हा कसे सुरळीत सुरू होतील, यासाठी सर्वप्रथम पावले उचलणे आवश्यक होते. केवळ बिहार निवडणुकीवर डोळा ठेवून भूमिपूजनाची घाई केली जात आहे हे सर्व जाणतात, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राम मंदिराची उभारणी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. प्रभुराम यांनी जगाला त्याग आणि सेवा करण्याची शिकवण दिली. त्याचा अंगीकार नेत्यांनी करण्याची गरज आहे. रामाच्या नावाने सध्या जे राजकारण सुरू आहे ते मान्य नाही. ज्या ठिकाणी आता भूमिपूजन करण्यात येणार आहे तेथे १९८९ मध्ये मंदिराच्या नूतनीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. बुधवारी पुन्हा प्रदर्शन करून भूमिपूजनाची आवश्यकता नव्हती. कोरोनाचे थैमान सुरू असताना हा कार्यक्रम पुढे ढकलला असता तर बरे झाले असते.- इसाहक बिराजदार, लेखक, दूरदर्शनभूमिपूजन काही दिवसांनी झाले असते, तर काही बिघडले नसते. सध्या देश संकटात असताना इतकी घाई करण्याची गरज नव्हती.- फैसल चौधरी,सामाजिक कार्यकर्ताअयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी बुधवारी होत असलेल्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जादा कुमक मागविण्यात आलेली नाही.- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणेआम्ही देशाचे संविधान मानतो. संविधानामधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतिम आहे. यामुळे न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. काही जण राजकीय हेतूने मंदिर उभारणीला विरोध करीत आहेत. त्यांचा हा विरोध ९९.९९ टक्के मुस्लीम नागरिकांना मान्य नाही. परंतु कोरोनाचे संकट सुरू असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम एवढ्या घाईने उरकण्याची गरज नव्हती. उत्तरेतील काही राज्यांमध्ये आगामी काही महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भूमिपूजनाची घाई करण्यात आली हे उघड आहे.- हसन मुल्लाणी, प्राध्यापकसर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. मंदिर उभारणीसाठी बुधवारी होत असलेले भूमिपूजन आणि आणि त्यानंतर मंदिराची उभारणीही सुरळीत व्हावी. पण पुन्हा १९९२ सारखी परिस्थिती उद्भवू नये. त्यावेळी दंगलीनंतर जीवाच्या भीतीने मुंबईतून मुंब्रा येथे आलो होतो. तेव्हा झालेले हाल भोगावे लागू नयेत. कुणावरही स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा आहे.- अन्सार अहमद सिद्दिकी,भाजी विक्रेता

टॅग्स :thaneठाणेRam Mandirराम मंदिर