शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विजेची वायर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा मृत्यू, कल्याणला संतप्त जमावाची पार्थिवासह महावितरण कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:21 IST

कल्याण दि.10 सप्टेंबर :  विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा आज मृत्यू झाल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाले ...

कल्याण दि.10 सप्टेंबर :  विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा आज मृत्यू झाल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाले होते. तसेच नुकसानभरपाई मिळेपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेत स्थानिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित कुटुंबीयांचे बोलणे करून दिल्यानंतर हा तणाव निवळला.

पिसवली गावात राहणाऱ्या जितेंद्र तिवारी हा भाजी विक्रेता 4 सप्टेंबरला विजेची वायर अंगावर पडून 60 टक्के भाजला होता. त्याच्यावर सुरुवातीला एम्स आणि मग नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामूळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी जितेंद्र यांच्या पार्थिवासह टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. तसेच तिवारी याच्या कुटुंबीयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपा कल्याण डोंबिवली शहर सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची समजूत काढली. तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी तिवारी यांच्या भावाचे बोलणे करून दिले. त्यानंतर हा जमाव शांत झाला आणि त्यांनी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले. तिवारी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या पत्नीला महावितरणमध्ये नोकरी द्यावी आणि उपचाराचा संपूर्ण खर्च द्यावा, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी बोलणे झाल्याचे शिवाजी आव्हाड यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणीही स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.