शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वेदांतमधील ‘त्या’ चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही; चौकशी समितीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 05:45 IST

प्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू : चौकशी समितीचा निष्कर्ष

ठाणे : येथील वर्तकनगरमधील वेदांत हॉस्पिटलमध्ये सोमवारी ऑक्सिजनअभावी चार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात त्या चार रुग्णांचा मृत्यू वैद्यकीय हलगर्जीपणा अथवा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले  आहे.

सोमवारच्या घटनेनंतर चौघांचा मृत्यू ऑक्सिजनअभावीच झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केल्याने रुग्णालय प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी करून या प्रकरणात सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते.

या समितीने सोमवारी सायंकाळी उशिरा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार येथे एकूण किती मृत्यू झाले, मृतांची नावे, वय, कोविड आजाराबाबत व रुग्णाच्या आरोग्य विषयक स्थितीची इतर आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. तसेच मृत्यू एकाच वेळेस झाले की वेगवेगळ्या वेळेत झाले याची माहितीही घेतली गेली, मृत्यूची कारणे, व मृत्यूची वेळ या रुग्णांच्या मृत्यूचा ऑक्सिजनपुरवठ्याशी काही संबंध आहे का, याचीदेखील सविस्तर माहिती घेण्यात आली.

विशेष म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनवर असलेल्या इतर रुग्णांशीदेखील या समितीमधील सदस्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार या चारही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असून, प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूची वेळ वेगवेगळी असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. येथे उपचारार्थ अन्य रुग्ण असून, ऑक्सिजन नसता तर त्यांनादेखील त्याचा फटका बसला असता. परंतु, तसे काहीच निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच त्या चार रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस