शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

खो-खो खेळाडूंच्या मृत्यूप्रकरणी; अहमदनगर जिल्हा संघ व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 18:30 IST

रस्ता ओलांडताना, झालेल्या अपघातप्रकरणी मयत खेळाडूच्या हा अपघात निष्काळजीपणाने झाला आहे. याबाबत सातत्याने त्या खेळाडूच्या पित्याने वारंवार केलेल्या पाठपुरावानंतर,सुमारे दोन वर्षानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे, त्या खेळाडूच्या पित्याला यश आले आहे.

ठळक मुद्दे निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सुमारे दोन वर्षांनी ठाण्यात गुन्हा दाखलयाप्रकरणी,संघ व्यवस्थापकाला अद्यापही कोणालाही अटक केली नाही

ठाणे : आइस्क्रीम खाण्यासाठी खो-खो संघातील १४ वर्षांखालील खेळाडूंना घेऊन जाताना घोडबंदर रोडवरील रोड अपघातात अहमदनगरमधील एका तेरावर्षीय खेळाडूचा ३१ जानेवारी २०१६ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्या खेळाडूच्या वडिलांनी केलेल्या अर्जात संघ व्यवस्थापकाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. त्यानंतर, सुमारे दोन वर्षांनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कार्तिक हरदास (१३) असे त्या मयत खेळाडूचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शाळेचा विद्यार्थी आहे. याप्रकरणी, अद्यापही कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात जानेवारी २०१६ रोजी राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आयोजिल्या होत्या. या स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील गटातील विविध जिल्ह्यांतून खो-खो संघ ठाण्यात आले होते. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा संघ घेऊन संघ व्यवस्थापक सुमित सुनील चव्हाण हे ठाण्यात आले होते. तसेच या खेळाडूंसाठी आयोजकांनी राहण्याची व्यवस्था घोडबंदर रोडवरील एम्पिरिया बिल्डिंगमध्ये करून येजा करण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. ३१ जानेवारी २०१६ रोजी रात्री चव्हाण हे रात्रीचे जेवण झाल्यानंतर संघातील १० खेळाडूंना घेऊन आइस्क्रीम खाण्यासाठी घोडबंदर रोडवरील आर मॉल परिसरात जात होते. या वेळी, त्यांनी रोडवर डिव्हायडर व त्यावर रेलिंग असतानाही प्रतिबंधित दुभाजकावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अनोळखी वाहनाने कार्तिकला धडक दिल्याने गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्या वेळी अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.याचदरम्यान, मयत कार्तिक हा हरदास कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. शिक्षक असलेल्या कार्तिकच्या वडिलांना सर्व खेळाडू हे १४ वर्षांखालील असताना त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी ही संघ व्यवस्थापक चव्हाण यांची होती. तरीदेखील, त्यांनी १० खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार न करता रस्ता ओलांडताना कार्तिकचा मृत्यू झाल्याचे वारंवार अर्जाद्वारे निदर्शनास आणून दिले. त्या अर्जानुसार अखेर १ डिसेंबर २०१७ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात संघ व्यवस्थापक सुमित चव्हाण यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक (गुन्हे) के.ए. कर्पे यांनी दिली.‘‘हे प्रकरण जरी जुने असले, तरी मयत मुलाच्या वडिलांनी केलेल्या अर्जात निष्काळजीपणा केल्याचे स्षष्टपणे दिसत आहे. विशेष बसची मागणी करून किंवा झेब्रा क्रॉसिंग करून रस्ता ओलांडताना त्याक डे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.’’ - बी.टी. बरावरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे