शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

येऊरमधील त्या मादीचा मृत्यू बिबट्यामधील भांडणामुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:11 IST

ठाणे येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला.

- सुरेश लोखंडेठाणे : येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. सुमारे तीन दिवसांच्या कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मादीचा मृत्यू दोन बिबट्यांमधील भांडणात गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे झाल्याचे येऊर येथील वनविभाग कार्यालयाने स्पष्ट केले.येऊर जंगलाच्या पूर्वेकडील चिखलाचापाडा परिसरातील झुडुपांत ती मृतावस्थेत आढळून आली होती. गंभीर जखमी झालेल्या या मादीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे शवविच्छेदनावरून निदर्शनात आल्याचे येऊर परिक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी लोकमतला सांगितले. मृत बिबट्या शनिवारी चिखलाचापाड्याजवळील झुडुपांत वनविभागाच्या गस्ती पथकास आढळून आला. कुजलेला मृत बिबट्या बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात केले. या अहवालास अनुसरून चार वर्षांच्या मादी बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. दोन बिबट्यांच्या भांडणातून हा मृत्यू झाल्याचा दावा पवार यांनी केला.तिच्या मानेकडील भागावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला आढळून आला. तोंडावरही मोठ्या प्रमाणात जखमा आढळल्या असून ते छिन्नविछिन्न झाले होते. यावरून मान व तोंडाचे लचके तोडल्याचा संशय आहे. यावरून दोन बिबट्यांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या तिने पळ काढून झुडुपांत आश्रय घेतला. त्यानंतर, तिला अन्यत्र जाता आले नाही आणि ती तिथेच मृत झाली. त्यानंतर, चार दिवसांनी गस्तीवरील पथकास तिची चाहूल लागली. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तिचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे वनविभागाने सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याthaneठाणे