शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

कचऱ्याला मुदत २४ मार्चची

By admin | Updated: March 17, 2017 06:16 IST

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करणे आणि घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत गेल्या आठ वर्षांत फारशी प्रगती न केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादा

मुरलीधर भवार, कल्याणआधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करणे आणि घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत गेल्या आठ वर्षांत फारशी प्रगती न केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादाने कल्याण-डोंबिवली पालिकेला फैलावर घेतले असून २३ मार्चला अंतिम प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यात जर ठोस उपाययोजना नसतील, तर महापालिकेतील सर्व विकासकामे थांबवू असा सज्जड इशारा दिला आहे. एवढेच नव्हे, तर पालिकेचे काम समाधानकारक नसेल; तर २४ तारखेनंतर दररोज एक लाखाचा दंड ठोठावला जाईल, असेही लवादाने बजावल्याने खळबळ उडाली आहे. पालिका आयुक्त आणि त्यांच्या अहवाल प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर ताशेरे ओढत लवादाने ही कठोर भूमिका घेतली आहे. घनकचरा प्रक्रियेचा शास्त्रोक्त प्रकल्प कधी, केव्हा उभारणार याचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेशही बुधवारच्या सुनावणीदरम्यान दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पालिकेचा अहवालावर लवादाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 564टन कचरा प्रक्रियेविनामहापालिका क्षेत्रात दररोज ५७० मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यापैकी केवळ सहा टन कचऱ्यावर महापालिका प्रक्रिया करते. उर्वरित ५६४ मेट्रिक टन कचरा हा प्रक्रिया न करताच डम्पिंगवर टाकला जातो. महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात २००८ साली याचिका दाखल झाली. गेल्या आठ वर्षात महापालिकेने घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रकल्प उभारण्यासाठी ठोस प्रयत्न न केल्याबद्दल लवादाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी आणि पालिकेने सादर केलेला हा अहवाल अर्थहीन आहे. २००२ च्या घनकचरा नियमावलीच्या आधारे तो तयार करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनाची नियमावली गेल्या वर्षी नव्याने आली. तिच्या आधारे नव्याने सविस्तर कालबद्ध कार्यक्रम सांगणारा ठोस अहवाल सादर करावा. त्यात आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड कधी बंद करणार; बारावे, मांडा भरावभूमी क्षेत्र कधी विकसित करणार, बायोगॅसचे १३ प्रकल्प कधी सुरु करणार याचा स्पष्ट उल्लेख हवा असे लवादाने बजावले आहे. या कालबद्ध ठोस कार्यक्रमाचे प्रतिज्ञापत्र येत्या २३ मार्च रोजी लवादाकडे सादर करावे. ते सादर न केल्यास २४ मार्चपासून दर दिवसाला एक लाख रुपये दंड आकारणी करण्याची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा लवादाकडून देण्यात आला आहे. २००२ च्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीची अंमलबजावणी पालिकेने अद्याप केलेली नाही. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने जागरुक नागरिक कौस्तुभ गोखले यांनी २००८ साली पालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २००८ पासून २०१६ पर्यंत या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच शहरातील नव्या इमारतींच्या बांधकामावर बंदी घातली होती. नंतर पालिकेच्या आश्वासनानंतर ती उठवण्यात आली. याचिका घनकचऱ्यासंदर्भात आणि पर्यावरणाशी निगडीत असल्याने न्यायालयाने ती राष्ट्रीय हरीत लवादाकडे वर्ग केली. लवादाकडे आतापर्यंत तीन सुनावण्या झाल्या. त्यातील पहिल्या तारखेला आयुक्त हजर नव्हते.