शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदत; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 01:29 IST

१५ एकरवर साकारणार अर्बन फॉरेस्ट्री

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील सर्वात महत्त्वाची समस्या घनकचरा विल्हेवाट व व्यवस्थापनाची आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीत चर्चेला आला. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आयुक्तांसोबत या विषयावर चर्चा केली. त्यानंतर, डम्पिंग ग्राउंड एप्रिल २०२० पर्यंत बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.

उंबर्डे, बारावे आणि मांडा कचरा प्रकल्पांसह बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी सुरू झाले पाहिजे. हे प्रकल्प मे महिन्यात सुरू करण्यात यावे. त्यासाठी मे महिन्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंडचा १५ एकरचा भूखंड मोकळा झाल्यावर तिथे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील अर्बन फॉरेस्ट्री प्रकल्प राबविण्याचे यावेळी सुचविण्यात आले.

महापोर्टल भरती प्रक्रियेची अट शिथिल करा...

रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालय हे महापालिकेकडून सरकारकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा मध्यंतरी उपस्थित केला जात होता. त्याला सदस्यांनी विरोध केला. या रुग्णालयांच्या वैद्यकीय पदांना मान्यता आहे. त्याची भरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे केली जाते. त्यामुळे डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. मानधनावर डॉक्टर येत नाहीत. त्यामुळे वाढीव मानधन देऊन कंत्राट पद्धतीवर डॉक्टर भरती करण्याच्या मुद्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. महापोर्टल भरती होण्यापूर्वी तातडीने मानधनपद्धतीने डॉक्टर घेऊन मंजुरी देण्याच्या विषयावरही यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेdumpingकचरा