शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदत; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 01:29 IST

१५ एकरवर साकारणार अर्बन फॉरेस्ट्री

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील सर्वात महत्त्वाची समस्या घनकचरा विल्हेवाट व व्यवस्थापनाची आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून नागरिकांची सुटका करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीत चर्चेला आला. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आयुक्तांसोबत या विषयावर चर्चा केली. त्यानंतर, डम्पिंग ग्राउंड एप्रिल २०२० पर्यंत बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.

उंबर्डे, बारावे आणि मांडा कचरा प्रकल्पांसह बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी सुरू झाले पाहिजे. हे प्रकल्प मे महिन्यात सुरू करण्यात यावे. त्यासाठी मे महिन्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंडचा १५ एकरचा भूखंड मोकळा झाल्यावर तिथे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील अर्बन फॉरेस्ट्री प्रकल्प राबविण्याचे यावेळी सुचविण्यात आले.

महापोर्टल भरती प्रक्रियेची अट शिथिल करा...

रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालय हे महापालिकेकडून सरकारकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा मध्यंतरी उपस्थित केला जात होता. त्याला सदस्यांनी विरोध केला. या रुग्णालयांच्या वैद्यकीय पदांना मान्यता आहे. त्याची भरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे केली जाते. त्यामुळे डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. मानधनावर डॉक्टर येत नाहीत. त्यामुळे वाढीव मानधन देऊन कंत्राट पद्धतीवर डॉक्टर भरती करण्याच्या मुद्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. महापोर्टल भरती होण्यापूर्वी तातडीने मानधनपद्धतीने डॉक्टर घेऊन मंजुरी देण्याच्या विषयावरही यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेdumpingकचरा