शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पापा, घर नही आना...; मुलाच्या फोनने वडिलांना कोसळले रडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 03:52 IST

गावाबाहेर राहण्याच्या फर्मानामुळे नकार

मुंब्रा : ‘पापा, आप जहाँ है वही रहिये. गाँव मत आईये. आप अगर गाँव आएंगे तो हमारे सारे परिवार को घर छोडके गाँव के बाहर रहना पडेगा...’ मुलाचे हे उद्गार शोएब अन्सारी यांच्या कानांत शिशाच्या गरम रसासारखे ओतले गेले. सध्या बेरोजगार झालेल्या शोएबला उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी जायचे होते. श्रमिक एक्स्प्रेसचे तिकीट न मिळाल्याने एका ट्रकमधून जाण्याचे त्याने ठरवले होते. मात्र, मुलाचे हे उद्गार ऐकल्यावर त्याने गावी जाण्याचा बेत रहित केला.

लॉकडाउनमुळे मूळ गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या काही श्रमिकांच्या कुटुंबांतील सदस्यांनी आपल्या रक्ताच्या नात्यातील मंडळींना गावी येण्यापासून रोखले. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतील मजूर मुंबईत काम करतात. मात्र, ते जर गावी आले तर कोरोनाचा फैलाव वाढेल, या भीतीने त्यांच्या मूळ राज्यांमधील गावांतील लोकप्रतिनिधींनी त्यांना गावात प्रवेश करू न देण्याबाबत फतवे काढले आहेत.

काही गावांनी मुंबई किंवा अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तीला घरात प्रवेश दिला, तर संपूर्ण कुटुंबाला गावाबाहेरील क्वारंटाइन कक्षात राहण्याची सक्ती केली आहे, तर गावांनी बाहेरील व्यक्तींना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. मी गावी जाण्यासाठी इच्छुक होतो. परंतु, मुलाने फोनवर जे सांगितले, त्यामुळे मला मानसिक धक्का बसला. कितीतरी वेळ माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.अन्सारी हा नाका कामगार आहे.

बेरोजगारीमुळे मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होता. श्रमिकांच्या ट्रेनमधून जाण्यासाठी त्याने प्रयत्न केले. परंतु, प्रतीक्षा यादी बघून तो अवाक झाला. त्यानंतर, त्याने ट्रकमधून गावी जाण्याची तजवीज केली. चार दिवस आधी त्याने मुलाला फोन करून गावी येत असल्याचे सांगितले. मात्र, त्याची निराशा झाली. ज्यांच्यासाठी येथे मेहनत करतो, त्यांच्या मनात असलेली ही भावना उद्विग्न करणारी असल्याचे तो म्हणाला.

बिहारमध्येही अशीच परिस्थिती

काहीशी अशीच व्यथा महंमद अस्लम शेख याची आहे. तो बिहारचा असून त्याच्या गावाने बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे. आमच्या गावातील लोकांनाच आम्ही तिकडे येऊ नये, असे वाटत असेल, तर आम्ही कुठे जायचे, असा आर्त सवाल त्याने केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे