शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

पापा, घर नही आना...; मुलाच्या फोनने वडिलांना कोसळले रडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 03:52 IST

गावाबाहेर राहण्याच्या फर्मानामुळे नकार

मुंब्रा : ‘पापा, आप जहाँ है वही रहिये. गाँव मत आईये. आप अगर गाँव आएंगे तो हमारे सारे परिवार को घर छोडके गाँव के बाहर रहना पडेगा...’ मुलाचे हे उद्गार शोएब अन्सारी यांच्या कानांत शिशाच्या गरम रसासारखे ओतले गेले. सध्या बेरोजगार झालेल्या शोएबला उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी जायचे होते. श्रमिक एक्स्प्रेसचे तिकीट न मिळाल्याने एका ट्रकमधून जाण्याचे त्याने ठरवले होते. मात्र, मुलाचे हे उद्गार ऐकल्यावर त्याने गावी जाण्याचा बेत रहित केला.

लॉकडाउनमुळे मूळ गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या काही श्रमिकांच्या कुटुंबांतील सदस्यांनी आपल्या रक्ताच्या नात्यातील मंडळींना गावी येण्यापासून रोखले. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतील मजूर मुंबईत काम करतात. मात्र, ते जर गावी आले तर कोरोनाचा फैलाव वाढेल, या भीतीने त्यांच्या मूळ राज्यांमधील गावांतील लोकप्रतिनिधींनी त्यांना गावात प्रवेश करू न देण्याबाबत फतवे काढले आहेत.

काही गावांनी मुंबई किंवा अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तीला घरात प्रवेश दिला, तर संपूर्ण कुटुंबाला गावाबाहेरील क्वारंटाइन कक्षात राहण्याची सक्ती केली आहे, तर गावांनी बाहेरील व्यक्तींना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. मी गावी जाण्यासाठी इच्छुक होतो. परंतु, मुलाने फोनवर जे सांगितले, त्यामुळे मला मानसिक धक्का बसला. कितीतरी वेळ माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.अन्सारी हा नाका कामगार आहे.

बेरोजगारीमुळे मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होता. श्रमिकांच्या ट्रेनमधून जाण्यासाठी त्याने प्रयत्न केले. परंतु, प्रतीक्षा यादी बघून तो अवाक झाला. त्यानंतर, त्याने ट्रकमधून गावी जाण्याची तजवीज केली. चार दिवस आधी त्याने मुलाला फोन करून गावी येत असल्याचे सांगितले. मात्र, त्याची निराशा झाली. ज्यांच्यासाठी येथे मेहनत करतो, त्यांच्या मनात असलेली ही भावना उद्विग्न करणारी असल्याचे तो म्हणाला.

बिहारमध्येही अशीच परिस्थिती

काहीशी अशीच व्यथा महंमद अस्लम शेख याची आहे. तो बिहारचा असून त्याच्या गावाने बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे. आमच्या गावातील लोकांनाच आम्ही तिकडे येऊ नये, असे वाटत असेल, तर आम्ही कुठे जायचे, असा आर्त सवाल त्याने केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे