शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
5
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
6
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
7
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
8
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
9
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
11
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
12
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
13
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
14
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
15
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
16
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
17
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
18
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
19
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 20:39 IST

Cyclone Nisarga: वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.

मीरा रोडः निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु वादळाच्या शक्यतेने बोटी व त्यातील साहित्य सुखरुप ठेवण्यासाठी मच्छीमारांची मोठी तारांबळ उडाली. सुकवत ठेवलेली मासळी भिजून नुकसान  झाले. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेने समुद्र किनारी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले होते. या शिवाय अग्निशमन दल, पोलीस व तटरक्षक दलसुद्धा सज्ज होते. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी दिपक अनारे, तलाठी तर उपअधीक्षक शशिकांत भोसले, सहय्यक निरीक्षक सतीश निकमसह पोलीस व एनडीआरएफच्या जवानांनी कोळीवाड्यांमध्ये फिरून परिस्थतीचा आढावा घेतला. आयुक्त चंद्रकांत डांगे देखील पालिका अधिकारायांसह दुपारनंतर उत्तनला पोहोचले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला जात होता तसेच आवश्यक सूचना ते करत होते.  महसूल, पोलीस व पालिका प्रशासाने मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेवक शर्मिला गंडोली, हेलन गोविंद, एलायस बांडय़ा तसेच चर्चच्या धर्मगुरुंसोबत फिरून किना-यावर राहणा-या मच्छीमारांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. संत जोसेफ शाळा व वेलंकनी चर्च येथे लोकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी मच्छीमारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी भुतोडी बंदर भागातील समुद्रालगतची काही घरं रिकामी करायला घेतली होती. त्यांना नजीकच्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पालिकेने 5 बस लोकांना नेण्यासाठी तैनात केल्या होत्या. शिवाय रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते.

अनेक मच्छीमारांच्या बोटी समुद्रातच होत्या. वारा - पाऊस त्यातच वादळाचा धोका या मुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किना-यावर घेण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. क्रेनच्या सहाय्याने तसेच गरज असेल तिकडे मच्छीमारांनी दोरखंडाने बोटी ओढून किना-यास आणल्या. बोटींमधील जाळी व अन्य सामान काढण्यासह बोटींची बाहेरुन सफाई करण्याचे काम लगबगीने केले जात होते. त्सुनामी वेळी देखील उत्तन समुद्र किना-यास फटका बसलेला नसल्याने चक्रीवादळाबाबत देखील अनेक मच्छीमार फारसे गंभीर दिसत  नव्हते. परंतु अनेक घरांमध्ये चक्रीवादळाचे संकट टळू दे अशी प्रार्थना केली गेली. वादळी वा-यामुळे पत्रे उडून कोणी जखमी वा जीवितहानी होऊ याची भीती होती. सुदैवाने तशी घटना घडली नाही.

दरम्यान, वादळी वारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या 10 घडना घडल्या. सृष्टी, पेणकरपाडा, उत्तन, काशीगाव, आंबेडकर नगर, नवघरचे रवीकिरण आदी भागात झाडं पडली. नवघरच्या साईचरण इमारत भागात झाड पडल्याने एका वाहनाचे नुकसान झाले. तर भाईंदर पोलीस ठाण्या समोर रस्त्यावर उभारलेली तपासणी शेड खालुन जाणाराया वाहनांवर पडली. परंतु यात नुकसान असे झाले नाही असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ