शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 20:39 IST

Cyclone Nisarga: वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.

मीरा रोडः निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु वादळाच्या शक्यतेने बोटी व त्यातील साहित्य सुखरुप ठेवण्यासाठी मच्छीमारांची मोठी तारांबळ उडाली. सुकवत ठेवलेली मासळी भिजून नुकसान  झाले. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेने समुद्र किनारी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले होते. या शिवाय अग्निशमन दल, पोलीस व तटरक्षक दलसुद्धा सज्ज होते. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी दिपक अनारे, तलाठी तर उपअधीक्षक शशिकांत भोसले, सहय्यक निरीक्षक सतीश निकमसह पोलीस व एनडीआरएफच्या जवानांनी कोळीवाड्यांमध्ये फिरून परिस्थतीचा आढावा घेतला. आयुक्त चंद्रकांत डांगे देखील पालिका अधिकारायांसह दुपारनंतर उत्तनला पोहोचले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला जात होता तसेच आवश्यक सूचना ते करत होते.  महसूल, पोलीस व पालिका प्रशासाने मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेवक शर्मिला गंडोली, हेलन गोविंद, एलायस बांडय़ा तसेच चर्चच्या धर्मगुरुंसोबत फिरून किना-यावर राहणा-या मच्छीमारांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. संत जोसेफ शाळा व वेलंकनी चर्च येथे लोकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी मच्छीमारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी भुतोडी बंदर भागातील समुद्रालगतची काही घरं रिकामी करायला घेतली होती. त्यांना नजीकच्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पालिकेने 5 बस लोकांना नेण्यासाठी तैनात केल्या होत्या. शिवाय रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते.

अनेक मच्छीमारांच्या बोटी समुद्रातच होत्या. वारा - पाऊस त्यातच वादळाचा धोका या मुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किना-यावर घेण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. क्रेनच्या सहाय्याने तसेच गरज असेल तिकडे मच्छीमारांनी दोरखंडाने बोटी ओढून किना-यास आणल्या. बोटींमधील जाळी व अन्य सामान काढण्यासह बोटींची बाहेरुन सफाई करण्याचे काम लगबगीने केले जात होते. त्सुनामी वेळी देखील उत्तन समुद्र किना-यास फटका बसलेला नसल्याने चक्रीवादळाबाबत देखील अनेक मच्छीमार फारसे गंभीर दिसत  नव्हते. परंतु अनेक घरांमध्ये चक्रीवादळाचे संकट टळू दे अशी प्रार्थना केली गेली. वादळी वा-यामुळे पत्रे उडून कोणी जखमी वा जीवितहानी होऊ याची भीती होती. सुदैवाने तशी घटना घडली नाही.

दरम्यान, वादळी वारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या 10 घडना घडल्या. सृष्टी, पेणकरपाडा, उत्तन, काशीगाव, आंबेडकर नगर, नवघरचे रवीकिरण आदी भागात झाडं पडली. नवघरच्या साईचरण इमारत भागात झाड पडल्याने एका वाहनाचे नुकसान झाले. तर भाईंदर पोलीस ठाण्या समोर रस्त्यावर उभारलेली तपासणी शेड खालुन जाणाराया वाहनांवर पडली. परंतु यात नुकसान असे झाले नाही असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ