शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

ऑनलाइन अर्जात सायबर कॅफेची दुकानदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:53 IST

पोलीस हैराण : राजकीय नेत्यांचे वशिले, चिरीमिरी कामी येत असल्याची चर्चा

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : गावी जाण्यासाठी नागरिकांना ई-पास घेणे गरजेचे असून नियमानुसार आॅनलाइन अर्ज भरूनही ई-पास मिळत नसल्याने नागरिकांत असंतोष आहे. दुसरीकडे, ई-पास मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे व खोटीनाटी कारणे अर्जात दाखविली जात असल्याने पोलीस हैराण झाले आहेत.ई-पास देणारी साखळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर, जिल्हा व राज्यबंदी घालण्यात आली आहे. मात्र अशा वेळी गावी जाण्यासाठी अनेक नागरिक इच्छुक आहेत. विनाकारण गावी जाणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने ई-पास सुरू केले. ई-पास मिळविण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या वेबसाइटवर आॅनलाइन अर्ज करावे लागतात.

ई-पास मिळविण्यासाठी केलेले अर्ज पोलीस फेटाळतात. मात्र राजकीय नेत्यांची शिफारस असल्यास त्वरित ई-पास दिला जातो, असा नागरिकांचा अनुभव आहे. नागरिक ज्या सायबर कॅफेमधून अर्ज करतात, तो सायबर कॅफे चालक ई-पास कसे मिळतात, याचे विविध मार्ग दाखवतो. चिरीमिरी दिल्यावर ई-पास मिळतो, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र बहुतांश अर्जात खोटी माहिती, बनावट कागदपत्रे दिलेली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आपली पोलीस दरबारी ओळख असल्याचे सांगून ई-पास काढून देतो, असा धंदा जोरात सुरू आहे. पोलिसांनी छडा लावून ई-पास देण्यात पारदर्शकता आणण्याची मागणी होत आहे.ई-पाससाठी कराव्या लागणाºया अर्जासोबत प्रतिबंधित क्षेत्रात राहत नाही, असे महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांचे पत्र, आधारकार्ड, ज्या वाहनाने प्रवास करणार आहात त्याचा नंबर, गावी जाण्याचे कारण आदी कागदपत्रे जोडावी लागतात. नागरिक बहुतांश अर्ज सायबर कॅफेतून भरतात. मात्र बहुतांश अर्जावर कारण पटत नाही, असा शेरा मारून परवानगी नाकारली जाते.

टॅग्स :Policeपोलिस