शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उल्हासनगरला वालधुनी नदीचा शाप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 02:10 IST

हाजीमलंग पहाडातून उगम पावणारी वालधुनी नदी ग्रामीण भागातून वाहत येऊन अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याणमार्गे उल्हास नदी खाडीला मिळते.

- सदानंद नाईक, उल्हासनगरहाजीमलंग पहाडातून उगम पावणारी वालधुनी नदी ग्रामीण भागातून वाहत येऊन अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याणमार्गे उल्हास नदी खाडीला मिळते. २० ते २५ वर्षांपूर्वी नदीच्या पाण्याचा वापर ग्रामीण नागरिक पिण्यासाठी करत होते. तसेच नदीकिनारी खुली जमीन होती. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी पुणे शहराच्या धर्तीवर नदीच्या दोन्ही बाजूंनी उद्यान सुरू करण्याची संकल्पना महासभेत मांडली होती. तसेच नदीकिनाऱ्याची पाहणी केली होती. मात्र, त्याला विरोध झाल्यावर नदीकिनाºयावरील खुली जमीन कोणाच्या घशात गेली, हा संशोधनाचा विषय झाला. नदीकिनारी शेकडो बांधकामे उभी राहिल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन नदीकिनाºयाच्या घरांना पुराचा फटका बसत आहे.दरम्यान, अंबरनाथ व उल्हासनगरातील सांडपाणी विनाप्रक्रिया थेट नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच अंबरनाथ केमिकल झोनमधील कारखान्यांचे सांडपाणी नदीत सोडले जाते. नदीचे हे पाणी दरपाच मिनिटांनी रंग बदलत असल्याचा आरोप होत आहे. उल्हासनगरातील शेकडो जीन्स कारखाने सांडपाणी सोडत असल्याचा प्रकार न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशान्वये शेकडो जीन्स कारखाने सील करण्यात आले. वालधुनी नदीचा नाला बनल्याने नदी वाचवण्यासाठी वालधुनी बिरादरी नावाची संस्था समाजसेवी नागरिकांनी स्थापन केली. संस्थेमार्फत जनजागृती करून नदीला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.वालधुनी नदीच्या किनाºयावरील खुल्या जागेवर अतिक्रमण होऊ न शेकडो झोपड्या व पक्की बांधकामे उभी राहिली. तसेच पूरनियंत्रणरेषेच्या आत बांधकामे होऊन नदीच्या किनारी उल्हासनगर व अंबरनाथ शहरांच्या भुयारी गटारांची पाइपलाइन टाकण्यात आली. यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊ न उथळ झाले आहे. २६ जुलैच्या महापुरासारखा फटका यावर्षीही २६ जुलैला बसला आहे. हजारो नागरिकांची घरे नदीच्या पुराखाली होती. अंगावरील कपडे सोडून घरातील कपडे, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मुलांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पक्षीय नेते, समाजसेवी संघटना आपल्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे, अंथरूण व आर्थिक मदत देत आहे. मात्र, ती अपुरी असल्याचा टाहो पूरग्रस्त नागरिकांनी फोडल्याचे चित्र शहरात दिसत आहे.२६ जुलैला पुराचे पाणी परिसरातील हजारो घरांत घुसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. दरवर्षी कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती हजारो नागरिकांच्या वाट्याला येत असून यातून ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे. तहसील कार्यालयाने १८०० पेक्षा जास्त पूरग्रस्त घरांचे पंचनामे केले आहेत.संरक्षक भिंत हवीवालधुनीचे पात्र रुंद करण्यासाठी पूरनियंत्रणरेषेतील बांधकामे जमीनदोस्त करावी लागणार आहेत. त्यानंतर, दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधल्यास पुराचा धोका कमी होणार आहे. सखल भागांसह किनाºयावरील घरांचे पुनर्वसन करण्याची योजना राबवणे गरजेचे झाले.शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी वरदान की शाप, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दरवर्षी नदीच्या पुराचे पाणी हजारो नागरिकांच्या घरांत जाऊ न त्यांचे संसार उघड्यावर पडत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात नदीचे पात्र रुंद व खोल करणे, नदीकिनारी संरक्षक भिंत बांधणे आदी उपाययोजना केल्यास नदी शाप ठरण्याऐवजी वरदान ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी वालधुनी बिरादरी नदीबाबत जनजागृती करीत असूनही महापालिका व राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.सांडपाणी बंद करावालधुनी नदीला वडोलगाव येथे अंबरनाथ परिसरातून आलेला नाला मिळतो. याच नाल्यात अंबरनाथ येथील केमिकल झोनमधील कारखाने सांडपाणी सोडत असल्याने नदीच्या पात्रातील पाणी पाच मिनिटांनी रंग बदलत आहे. प्रदूषणाचा ठपका ठेवून उल्हासनगरातील शेकडो जीन्स कारखाने न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले. त्याचप्रमाणे केमिकल झोनमधील कारखान्यांवर बंदी कधी आणणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :riverनदीulhasnagarउल्हासनगर