शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सध्याची समीक्षा अत्र परत्र या सीमारेषेवर आहे - जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ.अनंत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 16:43 IST

कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्यानिमित्ताने साहित्यिक कोजागरी साजरी करण्यात आली. 

ठळक मुद्देवाचन प्रेरणा दिनाच्यानिमित्ताने साहित्यिक कोजागरी साजरी संशोधकाने चिकित्सकपणे सर्व गोष्टींचा विविधांगी विचार करायला हवा - डॉ.अनंत देशमुखडॉ. महेश केळुसकर यांच्या *जोर की लगी है यार*या कथासंग्रहाचे रसग्रहण

ठाणे : र.धो कर्वेंवर संशोधन करताना माझ्या लक्षात आलं की य.दी.फडके या ज्येष्ठ साहित्यिकांनी र.धों.वर संशोधन करताना समाजस्वास्थ्यचे अंकंच पाहिले नाहीत. त्यामुळे फडकेंच्या संशोधनात त्रुटी असल्याचे आढळले. संशोधकाने चिकित्सकपणे सर्व गोष्टींचा विविधांगी विचार करायला हवा. सध्याची समीक्षा अत्र परत्र या सीमारेषेवर आहे, मराठी समीक्षा संक्रमणावस्थेतून जातेय असे मत जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ.अनंत देशमुख यांनी व्यक्त केले. 

कोकण मराठी साहित्य परिषद - साहित्यिक कोजागीरी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे को.म.सा.प.चे केंद्रिय अध्यक्ष डाॅ.महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ.अनंत देशमुख, कवी आणि पत्रकार प्रशांत डिंगणकर, अभिनेते संजय क्षेमकल्याणी, शशिकांत तिरोडकर आणि कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने उपस्थित होत्या. डॉ.अनंत देशमुख यांच्या ' शोधयात्रा' या संशोधनपर ग्रंथाच्या आधारे त्यांची मुलाखत को.म.सा.प अध्यक्ष मेघना साने आणि कार्यकारिणी सदस्य संगीता कुलकर्णी यांनी घेतली. अत्यंत सहज सुंदर रितीने आणि खुबीने देशमुख सरांचा साहित्यिक प्रवास रसिकांसमोर उलगडणारी मुलाखत बरच काही मोलाचं ज्ञान रसिकांना देऊन गेली. प्रशांत डिंगणकर यांनी डॉ. महेश केळुसकर यांच्या *जोर की लगी है यार*या कथासंग्रहाचे रसग्रहण केले. मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना असलेल्या या पुस्तकातील, 'जोर की लगी है यार', 'तिसरा सामना उत्कंठा' अशा कथांचा आढावा घेत, रोज आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचा घणाघाती विचार कथेत मांडलाय हे रसिकांपर्यंत पोहोचवला. कोरी काँफी कडू लागली तरी त्याची चव जिभेवर रेंगाळत रहाते तसेच या कथाही वास्तव जीवनातील कटू सत्य प्रभावी पणे सांगतात अस ते म्हणाले. अभिनेता संजय क्षेमकल्याणी यांनी केळुस्कर यांच्या कथासंग्रहातील *जोर की लगी है यार* या कथेचे अभिवाचन अत्यंत प्रभावी, अभिनयपूर्ण केले, त्यामुळे कथा अक्षरशः नजरेसमोर तरळून गेली. अध्यक्षीय भाषणात महेश केळुसकर यांनी पुस्तकाचा गाव वसवण्याचे सुतोवाच केले, मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे लागतील असंही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या वेळी को.म सा प सभासदांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ही भरवले होते आणि सर्वांना थंडगार केसरी दूध कोजागरी निमित्ताने देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बोर्डे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईliteratureसाहित्य