शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ठाणे जिल्हातील नाकाबंदीमध्ये तीन हजार ८५ वाहनांवर कारवाई: ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 19:54 IST

देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. तरीही मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाऱ्या ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई४९० प्रवाशांवरही कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. मात्र, तरीही रुग्णवाहिका, दूधाचे टँकर किंवा मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाºया ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे. यामध्ये ११ लाख ४६ हजारांचा दंडही वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांसाठी लागू केली आहे. त्यानुसार सीआरपीसी १४४ अन्वये संचारबंदीची अंमलबजावणी झाली आहे. तरीही अनेक नागरिक शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही विनाकारण क्षुल्लक कारणे दाखवून घराबाहेर पडत आहेत. बरेच कामगार हे अन्य राज्यात किंवा जिल्हयामध्ये स्थलांतरासाठी रस्त्यावर येऊन मिळेल त्या वाहनाने गावी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ठाणे ग्रामीणच्या हद्दीतून जाणारे मुंबई - नाशिक, मुंबई- अहमदाबाद, कल्याण अहमदनगर आणि ठाणे काशीमीरा या मार्गावर या मार्गावरुन विनाकारण धोकादायकरित्या २६ वाहनांमधून मार्गक्रमण करणाºया ४९० प्रवाशांना नाकाबंदी दरम्यान पकडले आहे. तर मोटार वाहन कायद्याचा भंग करणाºया तीन हजार ८५ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल केला आहे. २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याबाबत ३१७ आरोपींविरुद्ध १७२ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २६ वाहने जप्त केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली. 

‘‘ संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्हयालगतच्या पाचही जिल्हयांच्या सीमा बंद केल्या आहेत. २८ ठिकाणी नाकाबंदी केली असून मुख्यालयाचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही अनेक भागांमध्ये तैनात केला आहे. संचारबंदीची काटेकोर अमलबजावणीसाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्हीद्वारेही निगराणी ठेवण्यात येत आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस