शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

ठाणे जिल्हातील नाकाबंदीमध्ये तीन हजार ८५ वाहनांवर कारवाई: ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 19:54 IST

देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. तरीही मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाऱ्या ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई४९० प्रवाशांवरही कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. मात्र, तरीही रुग्णवाहिका, दूधाचे टँकर किंवा मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाºया ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे. यामध्ये ११ लाख ४६ हजारांचा दंडही वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांसाठी लागू केली आहे. त्यानुसार सीआरपीसी १४४ अन्वये संचारबंदीची अंमलबजावणी झाली आहे. तरीही अनेक नागरिक शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही विनाकारण क्षुल्लक कारणे दाखवून घराबाहेर पडत आहेत. बरेच कामगार हे अन्य राज्यात किंवा जिल्हयामध्ये स्थलांतरासाठी रस्त्यावर येऊन मिळेल त्या वाहनाने गावी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ठाणे ग्रामीणच्या हद्दीतून जाणारे मुंबई - नाशिक, मुंबई- अहमदाबाद, कल्याण अहमदनगर आणि ठाणे काशीमीरा या मार्गावर या मार्गावरुन विनाकारण धोकादायकरित्या २६ वाहनांमधून मार्गक्रमण करणाºया ४९० प्रवाशांना नाकाबंदी दरम्यान पकडले आहे. तर मोटार वाहन कायद्याचा भंग करणाºया तीन हजार ८५ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल केला आहे. २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याबाबत ३१७ आरोपींविरुद्ध १७२ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २६ वाहने जप्त केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली. 

‘‘ संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्हयालगतच्या पाचही जिल्हयांच्या सीमा बंद केल्या आहेत. २८ ठिकाणी नाकाबंदी केली असून मुख्यालयाचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही अनेक भागांमध्ये तैनात केला आहे. संचारबंदीची काटेकोर अमलबजावणीसाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्हीद्वारेही निगराणी ठेवण्यात येत आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस