शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ठाणे जिल्हातील नाकाबंदीमध्ये तीन हजार ८५ वाहनांवर कारवाई: ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 19:54 IST

देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. तरीही मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाऱ्या ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई४९० प्रवाशांवरही कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर ठाणे जिल्हयाच्या सीमाही वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. मात्र, तरीही रुग्णवाहिका, दूधाचे टँकर किंवा मिळेल त्या वाहनातून धोकादायकरित्या प्रवास करणाºया ४९० प्रवाशांवर तसेच तीन हजार ८५ वाहनांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली आहे. यामध्ये ११ लाख ४६ हजारांचा दंडही वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांसाठी लागू केली आहे. त्यानुसार सीआरपीसी १४४ अन्वये संचारबंदीची अंमलबजावणी झाली आहे. तरीही अनेक नागरिक शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही विनाकारण क्षुल्लक कारणे दाखवून घराबाहेर पडत आहेत. बरेच कामगार हे अन्य राज्यात किंवा जिल्हयामध्ये स्थलांतरासाठी रस्त्यावर येऊन मिळेल त्या वाहनाने गावी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ठाणे ग्रामीणच्या हद्दीतून जाणारे मुंबई - नाशिक, मुंबई- अहमदाबाद, कल्याण अहमदनगर आणि ठाणे काशीमीरा या मार्गावर या मार्गावरुन विनाकारण धोकादायकरित्या २६ वाहनांमधून मार्गक्रमण करणाºया ४९० प्रवाशांना नाकाबंदी दरम्यान पकडले आहे. तर मोटार वाहन कायद्याचा भंग करणाºया तीन हजार ८५ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून ११ लाख ४६ हजारांचा दंड वसूल केला आहे. २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याबाबत ३१७ आरोपींविरुद्ध १७२ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २६ वाहने जप्त केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली. 

‘‘ संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्हयालगतच्या पाचही जिल्हयांच्या सीमा बंद केल्या आहेत. २८ ठिकाणी नाकाबंदी केली असून मुख्यालयाचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही अनेक भागांमध्ये तैनात केला आहे. संचारबंदीची काटेकोर अमलबजावणीसाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्हीद्वारेही निगराणी ठेवण्यात येत आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस