शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

कल्याणमध्ये संचारबंदी केवळ दुकान बंदपुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:41 IST

कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी गुरुवारपासून सुरू झालेली संचारबंदी ही केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद ...

कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी गुरुवारपासून सुरू झालेली संचारबंदी ही केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद दुकानांपुरतीच मर्यादित असल्याचे दिसून आले. अनेक नागरिक बिनकामाचे शहरात फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरोधात पोलीस व केडीएमसी अधिकारी कारवाई करत नसल्याने त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा आवाहन करण्यात आले असताना शहरात सकाळपासून विनाकारण नागरिक बाहेर पडले हाेते. सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रहदारी दिसून आली. चौकात पोलीस बंदोबस्त व महापालिकेचे कारवाई पथक होते. त्यांच्याकडून मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई केली गेली नाही. त्यामुळे नियम न पाळताच कोरोना कमी कसा होणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत हाेता. अत्यावश्यक सेवेतीलच कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार बुधवारपासूनच रेल्वेस्थानकात कल्याण पश्चिम आणि पूर्व भागात दोनच ठिकाणी प्रवेश खुला ठेवला होता. बांबू आणि दोरीचे बॅरिकेट्स बांधण्यात आले होते. सकाळी रेल्वेस्थानकात प्रवाशांची कोणतीही विचारपूस केली जात नव्हती. त्यामुळे सामान्य प्रवासीही थेट रेल्वेने प्रवास करताना दिसून आले.

दुपारी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना तिकीट दिले गेले. याप्रकरणी रेल्वे अधिकारी राजेंद्र गुजर यांनी सांगितले की, सकाळपर्यंत आदेश न आल्याने सकाळी सर्वसामान्यांना प्रवेश दिला गेला. आता फक्त ओळखपत्र तपासून तिकीट दिले जात आहे. कल्याण बसडेपोतूनही सर्व ठिकाणच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या गेल्या. त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

फोटो-कल्याण-रेल्वे स्टेशन

--------------------